शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

ही खासदार भ्रष्ट आहे, भाजपचेच दलाल आरोप करत होते; भावना गवळींवरून ठाकरेंची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 18:40 IST

मी मुख्यमंत्री असताना पोहरादेवी विकासाचा जो आराखडा मंजूर केला होता, त्यावर सरकारच्या नाकात दम करून तो आराखडा राबविणार.- उद्धव ठाकरे

मला एका गोष्टीची थोडी लाज वाटतेय. फडणवीसांसोबत पोहरादेवीला आलो होतो. विकास आराखडा दिला. लाखो लोक जमले होते. मी मुख्यमंत्री झालो. आराखडा मंजूर करून निधी दिला. निदान बांधकामाला वेळ लागेल पण रस्ता तरी नीट असेल. अजून रस्ता नीट नाहीय. मग केलत काय निधी गेला कुठे, त्यातही कोणी हप्ता खाल्ला. मी जो निधी दिला तो मधल्यामध्ये खाल्ला का याची चौकशी कोण करणार, असा सवाल ठाकरेंनी केला. 

मणिपूर शांत करायचे असेल तर मी उपाय सांगतो; उद्धव ठाकरेंनी फडणवीस, मोदींना लगावला टोला

आपल्या खासदार ताई पळाल्याच होत्या. एक दिवस फोटो आला पंतप्रधानांना राखी बांधताना. ही खासदार भ्रष्ट आहे असे आरोप भाजपाच्याच दलाल लोकांनी केले होते. तिच्या हातून मोदींनी राखी बांधून घेतली. ज्या ज्या शिवसैनिकांच्या ईडी, सीबीआयचे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले आहे त्यांना मी सगळ्यांना पाठविणार आहे जा त्या दलालाच्या घरी जा, या लोकांवर असे काय शिंपडलेस की ते स्वच्छ दिसू लागले, असे ठाकरे म्हणाले. 

मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपा गेली तरी चालते. राष्ट्रवादीसोबत गेली तरी चालते पण शिवसेनेने जायचे नाही. हे भाजपाचे हिंदुत्व थोतांड आहे. आज या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या शेतकऱ्यांच्या घराकडे पाहण्याचा वेळे नाहीय पण दुसऱ्यांची घरे तोडताय. हे हिंदुत्व मान्य आहे का? शेतकऱ्यांना वीज मिळत नाहीय, कायदा सुव्यवस्था मिळत नाहीय, महागाई वाढली आहे. फडणवीसांनी मी मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशमध्ये जाऊन महाराष्ट्रात वीज बिल माफ करून दाखवावी असे म्हटलेले. आमचे सरकार होते ते तीन चाकांचे सरकार होते. यांचे लगेच त्रिशुळ झाले. एवढे केंद्रात सरकार, महाराष्ट्रात सरकार मग शेतकऱ्यांचे विजबील का माफ करत नाहीत, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. 

मी मुख्यमंत्री असताना जो आराखडा मंजूर केला होता, त्यावर सरकारच्या नाकात दम करून तो आराखडा राबविणार. त्यासाठी मला तुमचे आशिर्वाद हवे आहेत. माझ्याकडे देण्यासारखे काही नाहीए. तिकडे पैसा आहे, पक्ष आहे. चिन्ह आहे. मोदींनी कर्नाटकात हनुमानाचे नाव घेऊन मतदान करावे असे सांगितलेले. पण तो हनुमानदेखील त्यांना पावलेला नाहीय. मी अष्टभुजा, दशभुजा भवानीचे ऐकत होतो. पण सहस्त्र, लाखो भुजा असलेल्यांचा समुदाय पाहिलाय, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBhavna Gavliभावना गवळीShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी