अकोला शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली
By Admin | Updated: May 27, 2014 18:54 IST2014-05-26T21:28:37+5:302014-05-27T18:54:36+5:30
वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना मनपाच्या नाकी नऊ येत असल्यानेच शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुषंगाने येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये आमदार गोपीकिशन बाजोरिया, मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, मजीप्राचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपातील शहर अभियंता आदींचा समावेश राहील.

अकोला शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली
अकोला: वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना मनपाच्या नाकी नऊ येत असल्यानेच शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुषंगाने येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये आमदार गोपीकिशन बाजोरिया, मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, मजीप्राचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपातील शहर अभियंता आदींचा समावेश राहील.
शहराची वाढती लोकसंख्या, मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची होणारी चोरी, अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या व त्या तुलनेत वसूल होणारी पाणीपी आदी विषय लक्षात घेतल्यास, मनपाच्या मूळ उद्देशाला बगल देण्यात आल्याचे समोर आले आहे. २००७ पर्यंत अकोला शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे होती. मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी ही योजना मनपाकडे घेतली. पाणीपी वसूल झाल्यास मनपाच्या तिजोरीत रक्कम जमा होईल,असा आशावाद तत्कालीन प्रशासनाला होता; परंतु झाले उलटेच. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरसेवक व अधिकार्यांनी हातमिळवणी करीत स्वत:चे खिसे भरण्यात धन्यता मानली. प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात सबमर्सिबल पंप, हातपंप व किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी फुटकळ कामांना महत्त्व देऊन जलप्रदाय विभागाच्या माध्यमातून अक्षरश: मनपाच्या तिजोरीला ओरबडण्याचे काम सुरू आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहर पाणीपुरवठ्याची योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात सतत लक्षवेधी उपस्थित केल्या. मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनीसुद्धा मध्यंतरी मुंबईस्थित नरीमन पॉइंट येथील मजीप्राच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत संपर्क साधला. तसेच स्थानिक अधिकार्यांसोबत बैठकही घेतली होती. या सर्व बाबी पाहता, २८ मे रोजी जिल्हाधिकार्यांच्या दालनात शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्यावर बैठकीचे आयोजन केले आहे.
** बीडची पाईप लाईन हडप
तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी कापशी तलावाची बीडची पाईप लाईन चोरीला जात असल्याची सबब पुढे करीत ती खोदण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी पीव्हीसी पाईपची लाईन जोडण्यात आली. पुढे बीडची अख्खी पाईप लाईन हडप करण्यात आली.
** शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास व पाणीपीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यास मनपा अपयशी ठरली. मजीप्रा पाणीपुरवठा करणारी सक्षम यंत्रणा असल्याने हस्तांतरणाचा पर्याय शिल्लक आहे.
- आमदार गोपीकिशन बाजोरिया