करिअरच्या धावपळीत हरवतेय मातृत्व
By Admin | Updated: July 9, 2014 23:45 IST2014-07-09T23:45:44+5:302014-07-09T23:45:44+5:30
सुखी संसाराचे चित्र आता हरवत चालले असून, शिक्षण-करिअरच्या मागे पळणारी आजची तरुणाई लगAाचा विचार 3क्-32 वर्षानंतर करू लागली आहे.

करिअरच्या धावपळीत हरवतेय मातृत्व
पुणो : वयाच्या 22-23 वर्षात लगA.. पंचविशीत पहिले मूल.. तिशीच्या अगोदर दुसरे.. हे सुखी संसाराचे चित्र आता हरवत चालले असून, शिक्षण-करिअरच्या मागे पळणारी आजची तरुणाई लगAाचा विचार 3क्-32 वर्षानंतर करू लागली आहे. त्यानंतर कुटुंब नियोजन आणि पस्तीशीनंतर मूल जन्माला घालण्याचा विचार.. अशातच घटस्फोट झालेल्यांनी दुसरे लगA केले तर चाळिशीनंतर मूल जन्माला घालणो.. हे चित्र पुण्यात दिसू लागले आहे. डॉक्टरांकडे अशा केसेस येण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढू लागले आहे. यामुळे महिला व पुरुषांमध्ये वंध्यत्वांचे प्रमाण वाढू लागले आहे आणि प्रसूतीची गुंतागुंतही वाढत आहे.
गेल्या 1क् वर्षात पुण्यात असे चित्र दिसून येत आहे. यामुळे बहुतांशी रुग्णालयांमध्ये वंध्यत्व, मूल न होणो, प्रसूतीत गुंतागुंत यावर उपचारासाठी येणा:या दांपत्यांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. त्यासाठी पुण्यात मोठय़ा रुग्णालयांमध्ये वंध्यत्व उपचार केंद्र, टेस्ट टय़ूब बेबी क्लिनिक, आयव्हीएफ सेंटर यांसारखी केंद्रे वाढली आहेत.
याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन म्हणाल्या, की निसर्गाने महिला व पुरुषाच्या शरीराची एक रचना केली आहे. त्याअंतर्गत मुली पूर्वी 12 ते 14 वर्षार्पयत वयात येतात आणि त्यांच्यात शारीरिक व मानसिक बदल होण्यास सुरुवात होते. मुलीचे लगA वयाच्या 25 वर्षाच्या आत, पहिले मूल 25 वर्षार्पयत आणि दुसरे मूल 3क् वर्षाच्या आत, हे आयडियल वय आहे. मात्र, शिक्षण आणि करिअरचा ताण आजच्या मुलींवरही दिसून येत आहे. दहावीपासूनच शिक्षणातील स्पध्रेचा ताण, त्यानंतर करिअरचा ताण यामुळे लगA करण्याचे वय वाढले असून, 3क्-32 वर्षानंतर लगA करण्याकडे तरुणाई वळत आहे. यानंतरही कुटुंबनियोजन, करिअरसाठी परदेशी जाणो यामुळे
मुले जन्माला घालण्याचा
विचार वयाच्या पस्तीशीनंतर
केला जात आहे. त्याचबरोबर आयटी व इतर क्षेत्रत काम करणारे तरुण-तरुणी यांमध्ये वाद होत असल्याने घटस्फोटाचे प्रमाणही वाढते
आहे. यानंतर पुन्हा दुसरे लगA वयाच्या 35-4क् वर्षानंतर केले जाते.
त्यानंतर मुले जन्माला घालण्याचा विचार केला जातो.
मात्र, शरीराच्या वाढीनुसार हार्मोन्समध्ये बदल होत असतो. त्याचबरोबर ताण-तणावाचा विपरीत परिणाम शरीरावर पडतो. यामुळे महिलांमधील स्त्री बीजांडे निर्माण होण्याची प्रक्रिया बदलते. पुरुषांमध्येही बदल होतात. यामुळे गर्भ राहण्यात अडचणी निर्माण होतात. यामुळे हवालदिल झालेले दांपत्य टेस्ट टय़ूब बेबी, कृत्रिम गर्भधारणा यांकडे वळत आहेत. (प्रतिनिधी)
4शिक्षण आणि करिअरच्या मागे धावणारी तरूणाई लगAाला जीवनात दुय्यम स्थान देत असल्याने ते करण्याचे वय वाढू लागले आहे. त्यानंतर कुटुंबनियोजन, परदेशात नोकरी आणि मग मुलाचा विचार, असे चित्र सुशिक्षित तरूणाईमध्ये दिसून येत आहे. मात्र, महिला व पुरूषांच्या वयाच्या वाढीबरोबर शरीरात हॉर्मोन्सचे बदल होऊन मुले होण्यामध्ये गुंतागुंत निर्माण होत आहे.
आजची तरूणाई शिक्षण-करिअरच्या मागे पळत असल्याने लगAाचे वय तिशीच्या पुढे गेले आहे आणि मूल जन्माला घालण्याचे वय 35 र्पयत वाढले आहे. अशात घटस्फोट झालेल्या महिलांचे मूल जन्माला घालण्याचे वय 4क् र्पयत वाढले आहे. यामुळे वंध्यत्वाच्या प्रमाणात वाढ होत आहे. मूल जन्माला घालण्यासाठी मग कृत्रिम गर्भधारणोकडे दांपत्य वळत आहेत. या सर्वासाठी लाईफस्टाईल प्रामुख्याने कारणीभूत आहे. हे धोके ओळखून लगAाअगोदर आणि आवश्यकता असल्यास लगAानंतर समुपदेशन करून घेणो ही काळाची गरज बनली आहे.
डॉ. वैजयंती पटवर्धन, स्त्रीरोगतज्ज्ञ