शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आषाढी वारीमध्ये केलेल्या कामाचे सर्वाधिक समाधान – जिल्हाधिकारी मुंढे

By admin | Published: May 01, 2016 6:59 PM

पंढरपूर आषाढीवारीनिमित्त केलेले काम सर्वाधिक महत्त्वाचे आणि समाधानाचे होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 1-  आजपर्यंतच्या सेवा कालावधीत सोलापूरचा कार्यकाळ समाधानकारक होता. त्यातही पंढरपूर आषाढीवारीनिमित्त केलेले काम सर्वाधिक महत्त्वाचे आणि समाधानाचे होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष समारंभात बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विजय काळम – पाटील, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, लोकसेवक या माध्यमातून काम करताना वैयक्तिक हितापेक्षा लोकहिताला प्राधान्य देवून नियमानुसार काम केले पाहिजे. हा मार्ग अवघड, खडतर असतो. यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. कामाशी बांधील (कमिटमेंट) राहून संस्थात्मक काम झाले पाहिजे. सध्या चालु असलेली विविध कामे एक दीड महिना चालू ठेवनू  पुढे न्यावीत. आपणामध्ये खुप क्षमता आहे त्याचा वापर करा, स्वत:ला सशक्त करा, त्यानंतर लोकांना सशक्त करा, स्वत:मध्ये, इतरांमध्ये बदल करताना त्रास होतो. पण काही काळ त्रास होतो, परंतू त्यानंतर काही काळाने कायमस्वरुपी त्रास होतो. जीवनात हे तत्व अंगीकरावे असे आवाहन श्री. मुंढे यांनी केले.
जीवन मूल्य व तत्वावर आधारित जगले पाहिजे स्वत:ला समाधान मिळण्यासाठी काम करा, चांगल्या सवयी   लावा यासाठी चांगला विचार करा नंतर त्याप्रमाणेच वागा, परत तेच करा यामुळे सवय लागेल सवय झाली की यातून संस्कृती निर्माण होते त्यानंतर मूल्य तयार होते. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. प्रशासनात काम करताना भावनिक होण्यापेक्षा संवेदनशील व्हा असे आवाहन श्री. मुंढे यांनी केले.
 याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त काळम – पाटील यांनी जिल्हाधिकारी मुंढे यांच्या कार्यपध्दतीबद्दल बोलताना वेगळेपण हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट होते असे सांगितले तर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु यांनी जिल्हाधिकारी मुंढे  यांच्या कामाची पध्दत वेगळी असली तर नियमानुसार कामे करणे लोकहिताची  कामे करणे हाच त्यांचा उद्देश होता. टीम वर्क म्हणून त्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे असे गौरवोद्गार काढले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, प्रांताधिकारी शहाजी पवार, श्रीमती मनिषा कुंभार, अधिक्षक अभियंता राजकुमार कांबळे, नगरपालिका विभागाचे प्रशासन अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदींनी श्री. मुंढे यांचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला तसेच त्यांच्या कार्याबाबतची समायोचित भाषणे झाली.