शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 06:12 IST

कृषी विभागात सध्या  विविध संवर्गत सुमारे २७ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. यापूर्वी या विभागात बदल्यांच्या अधिकारांचे शासन स्तरावर केंद्रीकरण झाले होते.

मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विकेंद्रीकरण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अशा विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला असला तरी इतर मंत्र्यांनी अद्याप तसे केलेले नाही.

कृषी विभागात सध्या  विविध संवर्गत सुमारे २७ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. यापूर्वी या विभागात बदल्यांच्या अधिकारांचे शासन स्तरावर केंद्रीकरण झाले होते. मात्र, आता नवीन शासन निर्णयानुसार कृषी संचालक या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित व मुदतपूर्व बदल्या पूर्वीप्रमाणेच मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने केल्या जाणार असून कृषी सहसंचालक व अधीक्षक कृषी अधिकारी या केवळ दोनच संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या कृषिमंत्री यांच्या मान्यतेने होणार आहेत.

त्यापेक्षा निम्न संवर्गातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी या तीन संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार आता कृषी आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. 

गट ‘क’ मधील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्वीप्रमाणे कृषी सहसंचालक यांच्यामार्फत करण्यात येतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत  पारदर्शकता आणण्यासाठी  कृषी विभागाने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला आहे.   

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेAgriculture Sectorशेती क्षेत्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार