शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 06:12 IST

कृषी विभागात सध्या  विविध संवर्गत सुमारे २७ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. यापूर्वी या विभागात बदल्यांच्या अधिकारांचे शासन स्तरावर केंद्रीकरण झाले होते.

मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विकेंद्रीकरण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अशा विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला असला तरी इतर मंत्र्यांनी अद्याप तसे केलेले नाही.

कृषी विभागात सध्या  विविध संवर्गत सुमारे २७ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. यापूर्वी या विभागात बदल्यांच्या अधिकारांचे शासन स्तरावर केंद्रीकरण झाले होते. मात्र, आता नवीन शासन निर्णयानुसार कृषी संचालक या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित व मुदतपूर्व बदल्या पूर्वीप्रमाणेच मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने केल्या जाणार असून कृषी सहसंचालक व अधीक्षक कृषी अधिकारी या केवळ दोनच संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या कृषिमंत्री यांच्या मान्यतेने होणार आहेत.

त्यापेक्षा निम्न संवर्गातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी या तीन संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार आता कृषी आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. 

गट ‘क’ मधील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्वीप्रमाणे कृषी सहसंचालक यांच्यामार्फत करण्यात येतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत  पारदर्शकता आणण्यासाठी  कृषी विभागाने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला आहे.   

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेAgriculture Sectorशेती क्षेत्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार