शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:39 IST

औरंगाबाद, जालना, लातूरचाही समावेश

- विकास झाडेनवी दिल्ली : हवेतील शुद्धता कायम राखण्यासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने काही मापदंड ठरवून दिले आहेत. मात्र, या मापदंडाला केराची टोपली दाखविणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली राजधानी प्रथम क्रमांकावर आहे. दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर आहे, तर महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुण्याचा नंबर लागतो.केंद्र सरकारने देशातील १२४ शहरांची नावे संसदेत जाहीर केली. या शहरांनी प्रदूषणाच्या सीमा ओलांडल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, हवेची गुणवत्ता विविध घटकांवर आधारित असते. त्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून ठरावीक शहराचा प्रदूषणाचा स्तर ठरविणे अवघड आहे. त्यामुळे हवेची शुद्धता राखण्यासाठी काही मापदंड ठरविण्यात आले आहेत.या यादीनुसार दिल्लीतील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सरासरी १८१ इतके आहे तर भोपाळमधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १७२, अमृतसरमधील प्रदूषणाचा स्तर १६६, जालंधरमधील प्रदूषणाचा स्तर १६५ आणि लुधियानामधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १६१ इतका आहे. या यादीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरे असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो. देशात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये १६, पश्चिम बंगालमध्ये ७, उत्तराखंड ३, मध्य प्रदेश ६, पंजाब ९, गुजरात ३, आंध्र प्रदेशातील १३ शहरांचा प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो. केंद्रीय पर्यावरण विभागाने हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी १ एप्रिल २०२० पासून इंधने आणि वाहनांना बीएस ४ आणि बीएस ६ अशी मानांकने लागू करण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोच्या उभारणीवर जास्त भर दिला जात आहे. स्वयंपाकासाठी हवा दूषित करणाऱ्या उपकरणांऐवजी सिलिंडर वापरण्यावर भर दिला जात आहे. आदी उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती दिली. देशात सर्वात प्रदूषित शहर दिल्ली देशात प्रदूषणात दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तराखंडने घेरलेल्या दिल्लीला सर्वाधिक प्रदूषणाचा फटका बसतो. नाेव्हेंबर ते मार्चपर्यंत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी ५०० ते १००० पर्यंत असते.हरयाणा आणि पंजाब येथे तण जाळण्याचे दुष्परिणाम दिल्लीला भोगावे लागतात. केंद्र सरकार आणि दिल्लीसह हरयाणा, पंजाब व उत्तर प्रदेश राज्य अद्यापही यावर तोडगा काढू शकले नाही.मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूरही प्रदूषित महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. राज्यातील १८ शहरे प्रदूषित आहेत. त्यात चंद्रपूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण