शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:39 IST

औरंगाबाद, जालना, लातूरचाही समावेश

- विकास झाडेनवी दिल्ली : हवेतील शुद्धता कायम राखण्यासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने काही मापदंड ठरवून दिले आहेत. मात्र, या मापदंडाला केराची टोपली दाखविणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली राजधानी प्रथम क्रमांकावर आहे. दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर आहे, तर महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुण्याचा नंबर लागतो.केंद्र सरकारने देशातील १२४ शहरांची नावे संसदेत जाहीर केली. या शहरांनी प्रदूषणाच्या सीमा ओलांडल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, हवेची गुणवत्ता विविध घटकांवर आधारित असते. त्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून ठरावीक शहराचा प्रदूषणाचा स्तर ठरविणे अवघड आहे. त्यामुळे हवेची शुद्धता राखण्यासाठी काही मापदंड ठरविण्यात आले आहेत.या यादीनुसार दिल्लीतील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सरासरी १८१ इतके आहे तर भोपाळमधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १७२, अमृतसरमधील प्रदूषणाचा स्तर १६६, जालंधरमधील प्रदूषणाचा स्तर १६५ आणि लुधियानामधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १६१ इतका आहे. या यादीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरे असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो. देशात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये १६, पश्चिम बंगालमध्ये ७, उत्तराखंड ३, मध्य प्रदेश ६, पंजाब ९, गुजरात ३, आंध्र प्रदेशातील १३ शहरांचा प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो. केंद्रीय पर्यावरण विभागाने हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी १ एप्रिल २०२० पासून इंधने आणि वाहनांना बीएस ४ आणि बीएस ६ अशी मानांकने लागू करण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोच्या उभारणीवर जास्त भर दिला जात आहे. स्वयंपाकासाठी हवा दूषित करणाऱ्या उपकरणांऐवजी सिलिंडर वापरण्यावर भर दिला जात आहे. आदी उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती दिली. देशात सर्वात प्रदूषित शहर दिल्ली देशात प्रदूषणात दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तराखंडने घेरलेल्या दिल्लीला सर्वाधिक प्रदूषणाचा फटका बसतो. नाेव्हेंबर ते मार्चपर्यंत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी ५०० ते १००० पर्यंत असते.हरयाणा आणि पंजाब येथे तण जाळण्याचे दुष्परिणाम दिल्लीला भोगावे लागतात. केंद्र सरकार आणि दिल्लीसह हरयाणा, पंजाब व उत्तर प्रदेश राज्य अद्यापही यावर तोडगा काढू शकले नाही.मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूरही प्रदूषित महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. राज्यातील १८ शहरे प्रदूषित आहेत. त्यात चंद्रपूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण