शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

सरकारला महिन्याची मुदत

By admin | Updated: May 31, 2017 04:27 IST

बळीराजाचा अंत पाहू नका. आत्मक्लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी आहे. कर्जमुक्तीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे

मुुंबई : बळीराजाचा अंत पाहू नका. आत्मक्लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी आहे. कर्जमुक्तीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा सामना करण्यास तयार रहावे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.स्वाभिमानी संघटनेची ‘आत्मक्लेश यात्रा’ पोलिसांनी भायखळा येथे रोखली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. मुंबई ते पुणे दरम्यान सलग नऊ दिवस सुरू असलेल्या या आत्मक्लेश यात्रेचा सभेने समारोप झाला. यावेळी दहा हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर कर्ज दुप्पट झाले आहे. मोदी सरकारच्या काळात तुरीचा दर प्रति क्विंटल अकरा हजार तर सोयाबीन सहा हजार वरून अडीच रुपयावर आला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करतो. मात्र, भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचेच राजकारण सुरू केले आहे. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले नव्हते असे सरकार म्हणत असल्याने या सरकारचा खोटारडेपणा समोर आला आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. सदाभाऊ खोत यांना लगावला टोलासीता संकटात असताना हनुमान मदतीला धावून येत नसेल, तर तो हनुमान काय कामाचा, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना खोचक टोला लगावला आहे. मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे, तिथे मी शेतकऱ्यांचेच प्रश्न मार्गी लावतोय, असे विधान खोत यांनी केले होते. राज्यपालांची घेतली भेटया यात्रेच्या समारोपानंतर राजू शेट्टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या सांगत त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारा, ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये तातडीने द्या, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्तता करा, शेतीपंपाला २४ तास वीज पुरवठा करावा, संपूर्ण तूर खरेदी करा आणि तूर खरेदी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.