शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

सरकारला महिन्याची मुदत

By admin | Updated: May 31, 2017 04:27 IST

बळीराजाचा अंत पाहू नका. आत्मक्लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी आहे. कर्जमुक्तीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे

मुुंबई : बळीराजाचा अंत पाहू नका. आत्मक्लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी आहे. कर्जमुक्तीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा सामना करण्यास तयार रहावे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.स्वाभिमानी संघटनेची ‘आत्मक्लेश यात्रा’ पोलिसांनी भायखळा येथे रोखली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. मुंबई ते पुणे दरम्यान सलग नऊ दिवस सुरू असलेल्या या आत्मक्लेश यात्रेचा सभेने समारोप झाला. यावेळी दहा हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर कर्ज दुप्पट झाले आहे. मोदी सरकारच्या काळात तुरीचा दर प्रति क्विंटल अकरा हजार तर सोयाबीन सहा हजार वरून अडीच रुपयावर आला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करतो. मात्र, भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचेच राजकारण सुरू केले आहे. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले नव्हते असे सरकार म्हणत असल्याने या सरकारचा खोटारडेपणा समोर आला आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. सदाभाऊ खोत यांना लगावला टोलासीता संकटात असताना हनुमान मदतीला धावून येत नसेल, तर तो हनुमान काय कामाचा, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना खोचक टोला लगावला आहे. मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे, तिथे मी शेतकऱ्यांचेच प्रश्न मार्गी लावतोय, असे विधान खोत यांनी केले होते. राज्यपालांची घेतली भेटया यात्रेच्या समारोपानंतर राजू शेट्टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या सांगत त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारा, ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये तातडीने द्या, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्तता करा, शेतीपंपाला २४ तास वीज पुरवठा करावा, संपूर्ण तूर खरेदी करा आणि तूर खरेदी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.