शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला महिन्याची मुदत

By admin | Updated: May 31, 2017 04:27 IST

बळीराजाचा अंत पाहू नका. आत्मक्लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी आहे. कर्जमुक्तीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे

मुुंबई : बळीराजाचा अंत पाहू नका. आत्मक्लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी आहे. कर्जमुक्तीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा सामना करण्यास तयार रहावे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.स्वाभिमानी संघटनेची ‘आत्मक्लेश यात्रा’ पोलिसांनी भायखळा येथे रोखली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. मुंबई ते पुणे दरम्यान सलग नऊ दिवस सुरू असलेल्या या आत्मक्लेश यात्रेचा सभेने समारोप झाला. यावेळी दहा हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर कर्ज दुप्पट झाले आहे. मोदी सरकारच्या काळात तुरीचा दर प्रति क्विंटल अकरा हजार तर सोयाबीन सहा हजार वरून अडीच रुपयावर आला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करतो. मात्र, भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचेच राजकारण सुरू केले आहे. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले नव्हते असे सरकार म्हणत असल्याने या सरकारचा खोटारडेपणा समोर आला आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. सदाभाऊ खोत यांना लगावला टोलासीता संकटात असताना हनुमान मदतीला धावून येत नसेल, तर तो हनुमान काय कामाचा, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना खोचक टोला लगावला आहे. मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे, तिथे मी शेतकऱ्यांचेच प्रश्न मार्गी लावतोय, असे विधान खोत यांनी केले होते. राज्यपालांची घेतली भेटया यात्रेच्या समारोपानंतर राजू शेट्टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या सांगत त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारा, ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये तातडीने द्या, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्तता करा, शेतीपंपाला २४ तास वीज पुरवठा करावा, संपूर्ण तूर खरेदी करा आणि तूर खरेदी घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.