शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

मान्सून एक्स्प्रेस निघाली, १० जून रोजी महाराष्ट्रात पोहोचणार; हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:55 IST

अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ आता पूर्णत: शमले आहे. मात्र, त्याचा प्रभाव म्हणून अजूनही मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे

मुंबई : मान्सूनने आता आपला प्रवास सुरू केला आहे. मान्सून २१ मे रोजी बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार बेट, अंदमानच्या समुद्राचा दक्षिण भाग आणि अंदमानच्या समुद्राच्या उत्तर भागात दाखल झाला. हवामानाने साथ दिली तरी मान्सूनचा पुढील प्रवास असाच वेगवान सुरू राहील आणि मान्सून १ जून रोजी केरळात, तर १० जून रोजी महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला.

अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ आता पूर्णत: शमले आहे. मात्र, त्याचा प्रभाव म्हणून अजूनही मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या किंचित सरी कोसळत आहेत. शुक्रवारी ढगाळ हवामान आणि किंचित सरींचे प्रमाण कमी झाले होते आणि मुंबईत बऱ्यापैकी स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. आता पुन्हा एकदा हवामानात झालेल्या बदलामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून मुंबईकर रात्रीसह दिवसाही घामाघूम हाेत आहेत.

दरम्यान, पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात, दक्षिण पूर्व भागात, अंदमानचा संपूर्ण समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :Rainपाऊस