शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

५० खोकेवरून सभागृहात मंत्री दादा भुसे अन् आमदार भाई जगताप यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:01 IST

ज्या भाषेत तुम्ही सवाल कराल त्याच भाषेत जबाब देण्याची ताकद विरोधी पक्षात आहे याची नोंद घ्या असा इशारा भाई जगताप यांनी सरकारला दिला.

मुंबई - विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ५० खोके विधानावरून जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं. नवीन सरकार आल्यानंतर सर्वात आधी आरेच्या कारशेडचा निर्णय घेतला. ९० टक्के काम झालंय असं सांगितले आणि त्याला १० हजार कोटी तरतूद केली. शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत असा आरोप भाई जगताप यांनी केला. 

भाई जगताप म्हणाले की, सरकार कसं आले हे आम्ही बघतोय. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर एक सांगतो. ज्या भाषेत तुम्ही सवाल कराल त्याच भाषेत जबाब देण्याची ताकद विरोधी पक्षात आहे याची नोंद घ्या. ही वेळ महाराष्ट्रात येऊ नये. मात्र ज्यापद्धतीने सरकार म्हणजे आपण खूप ताकदवान आहोत. कुठली ताकद ५० खोके, सबकुछ ओके ही ताकद? या देशातील, राज्यातील जनतेने सगळं काही बघितले आहे असं त्यांनी म्हटलं. 

बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल

भाई जगतापांच्या या विधानावर मंत्री दादा भुसे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दादा भुसे म्हणाले की, भाई जगताप मुंबई, शेतकरी प्रश्नांवर सभागृहात बोलतायेत. त्यात ५० खोके विषय काढता. आपण सामान्य कार्यकर्त्यांमधून इथं पोहचलो आहोत. ही गोष्ट बरोबर नाही. आम्ही खूप काही बोलू शकतो. लोकशाही परंपरेत पातळी सोडायची म्हटलं तर बरेच काही बोलू शकतो. पातळी पाळली पाहिजे. बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल असं भुसे यांनी सांगितले. तसेच आपण मंथन करायला पाहिजे. विधान परिषदेत त्यांचे सहकारी येऊ शकले नाहीत त्यावर चिंतन करण्याची गरज आहे. ते खोके कुठे गेलेत? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला. 

...तेव्हा १०० खोके घेतले का?

भाई जगताप आणि दादा भुसे यांच्यात झालेल्या वादामुळे विधान परिषदेत गोंधळ झाला. त्यात सभापतींनी भाषण तपासून त्यातील वाक्य काढून टाकू असं म्हटलं. परंतु सभागृहातील गोंधळ संपला नाही. या वादात भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनीही उडी घेतली. दरेकर म्हणाले की, याठिकाणी आमदार ३ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. मंत्री राज्याचे प्रतिनिधित्व करतात. ५० खोके कुणी, कुणाला दिले हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करताना तुमचे १०-११ लोक कुठे गेले? त्यांनी १०० कोटी घेतले का? दुसऱ्यांवर बोट दाखवतात. दलित समाजाचं प्रतिनिधी करणाऱ्याला खोक्याच्या नादात काढून टाकले असा टोला दरेकरांनी लगावला. दरम्यान, काँग्रेस पक्षाचं आणि सदस्याचं काय झालं हे आमचं आम्ही बघू. परंतु आयुष्यभर जातीभेद, धर्मभेद करायचा हा यांचा अजेंडा आहे. दरेकर रेकॉर्डवर बोलले आहेत असं भाई जगतापांनी प्रतिटोला लगावला.  

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापVidhan Parishadविधान परिषदpravin darekarप्रवीण दरेकर