शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

५० खोकेवरून सभागृहात मंत्री दादा भुसे अन् आमदार भाई जगताप यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:01 IST

ज्या भाषेत तुम्ही सवाल कराल त्याच भाषेत जबाब देण्याची ताकद विरोधी पक्षात आहे याची नोंद घ्या असा इशारा भाई जगताप यांनी सरकारला दिला.

मुंबई - विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ५० खोके विधानावरून जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं. नवीन सरकार आल्यानंतर सर्वात आधी आरेच्या कारशेडचा निर्णय घेतला. ९० टक्के काम झालंय असं सांगितले आणि त्याला १० हजार कोटी तरतूद केली. शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत असा आरोप भाई जगताप यांनी केला. 

भाई जगताप म्हणाले की, सरकार कसं आले हे आम्ही बघतोय. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर एक सांगतो. ज्या भाषेत तुम्ही सवाल कराल त्याच भाषेत जबाब देण्याची ताकद विरोधी पक्षात आहे याची नोंद घ्या. ही वेळ महाराष्ट्रात येऊ नये. मात्र ज्यापद्धतीने सरकार म्हणजे आपण खूप ताकदवान आहोत. कुठली ताकद ५० खोके, सबकुछ ओके ही ताकद? या देशातील, राज्यातील जनतेने सगळं काही बघितले आहे असं त्यांनी म्हटलं. 

बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल

भाई जगतापांच्या या विधानावर मंत्री दादा भुसे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दादा भुसे म्हणाले की, भाई जगताप मुंबई, शेतकरी प्रश्नांवर सभागृहात बोलतायेत. त्यात ५० खोके विषय काढता. आपण सामान्य कार्यकर्त्यांमधून इथं पोहचलो आहोत. ही गोष्ट बरोबर नाही. आम्ही खूप काही बोलू शकतो. लोकशाही परंपरेत पातळी सोडायची म्हटलं तर बरेच काही बोलू शकतो. पातळी पाळली पाहिजे. बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल असं भुसे यांनी सांगितले. तसेच आपण मंथन करायला पाहिजे. विधान परिषदेत त्यांचे सहकारी येऊ शकले नाहीत त्यावर चिंतन करण्याची गरज आहे. ते खोके कुठे गेलेत? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला. 

...तेव्हा १०० खोके घेतले का?

भाई जगताप आणि दादा भुसे यांच्यात झालेल्या वादामुळे विधान परिषदेत गोंधळ झाला. त्यात सभापतींनी भाषण तपासून त्यातील वाक्य काढून टाकू असं म्हटलं. परंतु सभागृहातील गोंधळ संपला नाही. या वादात भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनीही उडी घेतली. दरेकर म्हणाले की, याठिकाणी आमदार ३ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात. मंत्री राज्याचे प्रतिनिधित्व करतात. ५० खोके कुणी, कुणाला दिले हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करताना तुमचे १०-११ लोक कुठे गेले? त्यांनी १०० कोटी घेतले का? दुसऱ्यांवर बोट दाखवतात. दलित समाजाचं प्रतिनिधी करणाऱ्याला खोक्याच्या नादात काढून टाकले असा टोला दरेकरांनी लगावला. दरम्यान, काँग्रेस पक्षाचं आणि सदस्याचं काय झालं हे आमचं आम्ही बघू. परंतु आयुष्यभर जातीभेद, धर्मभेद करायचा हा यांचा अजेंडा आहे. दरेकर रेकॉर्डवर बोलले आहेत असं भाई जगतापांनी प्रतिटोला लगावला.  

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापVidhan Parishadविधान परिषदpravin darekarप्रवीण दरेकर