शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

‘तो’ परत येतोय... मुंबईसह राज्यभरात मान्सून पुन्हा बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 07:49 IST

मान्सूनचा आस देशातील त्याच्या सरासरी जागेपासून उत्तरेकडे म्हणजे हिमालयाच्या पायथ्याकडे शिफ्ट झाल्यामुळे उघडीप जाणवली होती.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस राजधानी मुंबईसह पुन्हा एकदा राज्यभरात सक्रिय होत असून, हवामानात होत असलेल्या बदलांमुळे पुढील चार दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार ६ आणि ७ ऑगस्टला कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारादेखील वाहील. 

पाऊस का पडणार ?मान्सूनचा आस देशातील त्याच्या सरासरी जागेपासून उत्तरेकडे म्हणजे हिमालयाच्या पायथ्याकडे शिफ्ट झाल्यामुळे उघडीप जाणवली होती. मात्र, आज, शुक्रवारपासून पुन्हा त्याच्या मूळ सरासरी जागेवर किंवा त्यापेक्षाही अधिक दक्षिणेकडे सरकण्याच्या व त्यामुळे पावसासाठी अनुकूलतेच्या शक्यतेमुळे पाऊस पडेल.समुद्रसपाटीपासून उंच आकाशात तीन किमी ते सात किमी अंतरादरम्यान मंगळूर, बंगळुरू व चेन्नई या शहरांवरून जाणारा पूर्व-पश्चिम एकमेकांविरुद्ध समांतर जाणारा वाऱ्याचा शिअर झोन अधिक अक्षवृत्तीय अंतरावरील उत्तरेकडे म्हणजे गोवा व दक्षिण महाराष्ट्रातील शहरावरून येत्या ३-४ दिवसांत शिफ्ट होण्याच्या वा जाण्याच्या शक्यतेमुळे पाऊस पडेल.

चेन्नई, नेल्लोर, मच्छलिपटणम शहरांदरम्यान बंगाल उपसागरात पूर्व किनारपट्टीसमोर जमिनीपासून एक किमी अंतरावर असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सून १२ दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात सक्रिय राहण्याची शक्यता जाणवते.

शुक्रवारपासून अपेक्षित असलेल्या मान्सूनची सक्रियता कदाचित एक दिवस अगोदरच म्हणजे गुरुवारपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पावसाने सुरुवात होऊ शकते. विशेषत: सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची सुरुवात होईल.- माणिकराव खुळे, माजी अधिकारी, हवामान खाते. 

कधी, केव्हा पडणार पाऊस?४ ऑगस्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.५ ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया६ ऑगस्ट : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा७ ऑगस्ट : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

टॅग्स :Rainपाऊस