शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
4
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
5
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
9
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
10
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
11
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
12
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
13
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
14
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
15
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
16
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
17
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
18
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
19
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
20
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

मान्सून उंबरठ्यावर तरी हमीदर जाहीर होईनात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 3:06 AM

राज्य कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशीवर प्रश्नचिन्ह

रूपेश उत्तरवार यवतमाळ : पेरणीपूर्वी शेतमालाचे हमीदर जाहीर करण्याचे केंद्राचे धोरण होते. प्रत्यक्षात मान्सून उंबरठ्यावर आला तरी शेतमालाचे हमीदर केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने जाहीर केले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षीच्या दराच्या अंदाजावरूनच खरिपाच्या पेरणीची तयारी करावी लागणार असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे.

राज्यात दरवर्षी एक कोटी हेक्टरवर खरिपाची पेरणी होते. एकाच पिकाचे क्षेत्र वाढल्याने बाजारात दर पडतात. म्हणून केंद्र शासनाने हंगामापूर्वीच दर जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात पाच वर्षात या नियमाची अंमलबजावणी झाली नाही. यंदाही केंद्र शासनाने हमी दर जाहीर केले नाहीत.

राज्य कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशी जाणून घेतल्यावर केंद्रीय कृषीमूल्य आयोग दर जाहीर क रते. यावर्षी राज्याने दरवाढीच्या शिफारशी केल्या आहे. २३ पिकांना खर्चावर आधारीत दर मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

कापसाला १५ टक्के दरवाढीचा प्रस्तावराज्य कृषीमूल्य आयोगाने केंद्राकडे शिफारशी सादर केल्या आहेत. यामध्ये कापूस पिकासाठी १५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे. गतवर्षी कापसाला ५०५० रूपयांचा हमीदर जाहीर झाला होता. यामध्ये १५ टक्के दरवाढ म्हटले तर ७५० रूपयाची भर पडणार आहे. यामुळे कापसाला ५८०० रूपये क्विंटलचा दर मिळू शकतो. ही शिफारस केंद्राने लागू केली तरच त्याची अंमलबजावणी होते अन्यथा कापसाचे दर जैसे थे राहण्याचा धोका आहे.

शुक्रवारी राज्याची खरिप आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत शेतमाल लागवडीचा कल लक्षात येईल. राज्याने केंद्राकडे शेतमालाच्या दराचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला दर जाहीर करण्याचे अधिकार आहेत. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषीमूल्य आयोग

टॅग्स :Farmerशेतकरी