शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मान्सून उंबरठ्यावर तरी हमीदर जाहीर होईनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 06:40 IST

राज्य कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशीवर प्रश्नचिन्ह

रूपेश उत्तरवार यवतमाळ : पेरणीपूर्वी शेतमालाचे हमीदर जाहीर करण्याचे केंद्राचे धोरण होते. प्रत्यक्षात मान्सून उंबरठ्यावर आला तरी शेतमालाचे हमीदर केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने जाहीर केले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षीच्या दराच्या अंदाजावरूनच खरिपाच्या पेरणीची तयारी करावी लागणार असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे.

राज्यात दरवर्षी एक कोटी हेक्टरवर खरिपाची पेरणी होते. एकाच पिकाचे क्षेत्र वाढल्याने बाजारात दर पडतात. म्हणून केंद्र शासनाने हंगामापूर्वीच दर जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात पाच वर्षात या नियमाची अंमलबजावणी झाली नाही. यंदाही केंद्र शासनाने हमी दर जाहीर केले नाहीत.

राज्य कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशी जाणून घेतल्यावर केंद्रीय कृषीमूल्य आयोग दर जाहीर क रते. यावर्षी राज्याने दरवाढीच्या शिफारशी केल्या आहे. २३ पिकांना खर्चावर आधारीत दर मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

कापसाला १५ टक्के दरवाढीचा प्रस्तावराज्य कृषीमूल्य आयोगाने केंद्राकडे शिफारशी सादर केल्या आहेत. यामध्ये कापूस पिकासाठी १५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे. गतवर्षी कापसाला ५०५० रूपयांचा हमीदर जाहीर झाला होता. यामध्ये १५ टक्के दरवाढ म्हटले तर ७५० रूपयाची भर पडणार आहे. यामुळे कापसाला ५८०० रूपये क्विंटलचा दर मिळू शकतो. ही शिफारस केंद्राने लागू केली तरच त्याची अंमलबजावणी होते अन्यथा कापसाचे दर जैसे थे राहण्याचा धोका आहे.

शुक्रवारी राज्याची खरिप आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत शेतमाल लागवडीचा कल लक्षात येईल. राज्याने केंद्राकडे शेतमालाच्या दराचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला दर जाहीर करण्याचे अधिकार आहेत. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषीमूल्य आयोग

टॅग्स :Farmerशेतकरी