‘मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक’
By Admin | Updated: June 22, 2014 00:09 IST2014-06-22T00:09:17+5:302014-06-22T00:09:17+5:30
रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे.

‘मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक’
>पिंपरी : रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी रेल्वे प्रवासी भाडय़ामध्ये 14.2 टक्के आणि वाहतूक भाडय़ात 6.2 टक्के वाढ करून जनतेला धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आयेंगे’ चा प्रचार करून देश महागाईयुक्त करण्याचे स्वप्न दाखवून मते मिळविली. पण, सत्तेवर येताच जनतेला महागाईच्या आणखी खोल खाईत लोटण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईप्रश्नी पूर्वीचे यूपीए सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना जबाबदार धरणा:या मोदींना या दरवाढीची त्या अनुषंगाने वाढणा:या महागाईची जबाबदारी घ्यावीच लागेल.
1978 मध्ये मधु दंडवते यांच्या रेल्वे मंत्रिपदाच्या कार्यकाळानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कदाचित पहिल्यांदाच दरवाढ झाली असावी. दरवाढ जाहीर करताना रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, सुविधामधील नवीन रेल्वे मार्ग विस्ताराबाबत कुठलेही धोरण जाहीर केलेले नाही. तसेच जुलैमध्ये संसदेमध्ये रेल्वे बजेट सादर होण्यापूर्वीच दरवाढ जाहीर करणो याचा अर्थ संसदीय लोकशाहीवर या सरकारचा विश्वास नाही, हेच स्पष्ट होत आहे, असे अध्यक्ष मानव कांबळे, युवाध्यक्ष प्रदीप पवार, सचिव नीलेश सुंबे, दिलीप काकडे, नागेश निकम, बापूसाहेब देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)