शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मोदींनी आधी मुंबई महापालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 20:30 IST

स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं,बाहेरून येणा-या लोंढ्यांमुळे मुंबई बकाल झाली असं ते म्हणाले.

मुंबई, दि. 1 - स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.  दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळात आज राज ठाकरेंची मुलाखत झाली त्यावेळी ते बोलत होते. 

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. याबाबत बोलताना राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका, शिवसेना आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं. स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं ते म्हणाले.

महानगरपालिकेतील टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली, पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं, असं राज म्हणाले.  यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांवर निशाणा साधला.  बाहेरून येणा-या लोंढ्यांमुळे मुंबई बकाल झाली असं ते म्हणाले.  लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी राज यांची मुलाखत घेतली. मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राज यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 

मुलाखतीतील मुद्दे - 

महाराष्ट्रात निर्माण होणा-या नोकरीच्या संधी मराठी तरूणांना द्या , आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे

माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवतो पूर्णवेळ कसं राजकारण करतात : राज ठाकरे

अमितची प्रकृती उत्तम आहे , बाप्पाच्या कृपेने अमितचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत : राज ठाकरे.

महाराष्ट्रात निर्माण होणा-या नोकरीच्या संधी मराठी तरूणांना द्या , आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे

मुंबई: इतर पक्ष संपवण्याचं पंतप्रधान मोदींचं राजकारण - राज ठाकरे.

मुंबई: पदाधिका-यांच्या कामाचा आढावा घेतोय - राज ठाकरे.

मुंबई: संघटना बांधणीमध्ये मी नेत्यांना दूर ठेवलं हे म्हणणं चुकीचं आहे : राज ठाकरे

मुंबई: टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली : राज ठाकरे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार