शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने राज्याला दिले १०.५० लाख कोटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:44 IST

Devendra Fadnavis: काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने महाराष्ट्राला १० वर्षांत १ लाख २३ हजार कोटी रुपये दिले, तर नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांत त्याच्या दहापट म्हणजे १० लाख ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई - काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने महाराष्ट्राला १० वर्षांत १ लाख २३ हजार कोटी रुपये दिले, तर नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांत त्याच्या दहापट म्हणजे १० लाख ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाला फाटा देऊन मोदी यांनी विकास, संशोधन आणि सर्वसमावेशकता आणली. संकल्पांपासून सिद्धीकडे जाताना त्यांनी पारदर्शक, प्रामाणिक, गतिशील आणि निर्णयक्षम सरकार दिले.

रेल्वेचे पावणेदोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. दहा वर्षांत रेल्वे खात्याने दिला नाही एवढा निधी महाराष्ट्राला मोदी सरकारच्या काळात एकाच वर्षात मिळाला. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रात सहा लाख कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, डॉ. भागवत कराड, डॉ. संजय कुटे उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्याशी जाहीर चर्चेची तयारीकाँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने साठ पानी उत्तर आधीच दिले आहे, त्यावर त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. काँग्रेसच्या एकाही निवडणूक प्रतिनिधीने मतदार याद्या वा अन्य विषयावर कोणताही आक्षेप मतदान आणि मतमोजणीवेळी घेतला नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक या विषयावर राहुल गांधींची इच्छा असेल तर खुली चर्चा करण्याची माझी तयारी आहे, असे फडणवीस यांनी एका प्रश्नात सांगितले. 

५५ कोटी जनधन खाती देशातील ८१ कोटी जनतेला मोफत धान्य दिल्याने ते दारिद्र्य रेषेच्या वर येण्यास मदत झाली. १५ कोटी घरांना नळजोडणी दिली गेली. आधीच्या सरकारने केवळ तीन कोटी नळजोडण्या दिल्या होत्या. ५५ कोटी जनधन खाती उघडली, मुद्रा योजनेत ५२ कोटी लोकांना अर्थसाहाय्य दिले, कृषी क्षेत्रासाठीची तरतूद २७ हजार कोटींवरून १ लाख ३७ हजार कोटींवर गेली. साडेबारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करण्यात आले, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार