शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मोदी सरकारने राज्याला दिले १०.५० लाख कोटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:44 IST

Devendra Fadnavis: काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने महाराष्ट्राला १० वर्षांत १ लाख २३ हजार कोटी रुपये दिले, तर नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांत त्याच्या दहापट म्हणजे १० लाख ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई - काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने महाराष्ट्राला १० वर्षांत १ लाख २३ हजार कोटी रुपये दिले, तर नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांत त्याच्या दहापट म्हणजे १० लाख ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाला फाटा देऊन मोदी यांनी विकास, संशोधन आणि सर्वसमावेशकता आणली. संकल्पांपासून सिद्धीकडे जाताना त्यांनी पारदर्शक, प्रामाणिक, गतिशील आणि निर्णयक्षम सरकार दिले.

रेल्वेचे पावणेदोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. दहा वर्षांत रेल्वे खात्याने दिला नाही एवढा निधी महाराष्ट्राला मोदी सरकारच्या काळात एकाच वर्षात मिळाला. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रात सहा लाख कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, डॉ. भागवत कराड, डॉ. संजय कुटे उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्याशी जाहीर चर्चेची तयारीकाँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने साठ पानी उत्तर आधीच दिले आहे, त्यावर त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. काँग्रेसच्या एकाही निवडणूक प्रतिनिधीने मतदार याद्या वा अन्य विषयावर कोणताही आक्षेप मतदान आणि मतमोजणीवेळी घेतला नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक या विषयावर राहुल गांधींची इच्छा असेल तर खुली चर्चा करण्याची माझी तयारी आहे, असे फडणवीस यांनी एका प्रश्नात सांगितले. 

५५ कोटी जनधन खाती देशातील ८१ कोटी जनतेला मोफत धान्य दिल्याने ते दारिद्र्य रेषेच्या वर येण्यास मदत झाली. १५ कोटी घरांना नळजोडणी दिली गेली. आधीच्या सरकारने केवळ तीन कोटी नळजोडण्या दिल्या होत्या. ५५ कोटी जनधन खाती उघडली, मुद्रा योजनेत ५२ कोटी लोकांना अर्थसाहाय्य दिले, कृषी क्षेत्रासाठीची तरतूद २७ हजार कोटींवरून १ लाख ३७ हजार कोटींवर गेली. साडेबारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करण्यात आले, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार