शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख : याेगेंद्र यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:10 IST

माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख असल्याची घाणाघाती टीका याेगेंद्र यादव यांनी केली.

पुणे : हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन हिंसाचार घडवणे हा सर्वात माेठा देशद्राेह आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शहा हे खरे तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख आहेत अशा शब्दात स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख याेगेंद्र यादव यांनी माेदी आणि शहा यांच्यावर टीका केली. 

पुण्यातील काेंढवा भागात सुरु असलेल्या प्रती शाहीनबाग आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठी यादव आज पुण्यात आले हाेते. यावेळी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विराेधात भारत जाेडाे आंदाेलन करण्यात येणार असून 22 फ्रेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जागृती करणार असल्याचेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. 

यादव म्हणाले, सीएए, एनआरसी यांना विराेध करण्यासाठी 'हम भारत के लाेग' ही चळवळ उभी करण्यात आली. या चळवळीत आता 125 हून अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. हे केवळ मुस्लिम समाजाचे नाही तर सर्वच समाजाचे आंदाेलन झाले आहे. तरुण माेठ्या संख्येने या कायद्यांच्या विराेधात रस्त्यावर उतरले आहेत. याचे आता 'भारत जाेडाे' या आंदाेलनात आम्ही रुपांतर करत आहाेत. ते ताेडायचे काम करतील आम्ही जाेडायचे काम करु. भारत जोडो हे आंदोलन हे एका नवीन भारताच्या निर्मिती चे आंदोलन असणार आहे. एन पी आरच्या माध्यमातून एनआरसी आणले जात आहे. एनपीआर आणि जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. जनगनणेचा वेगळा कायदा आहे. एनपीआर हे सिटीझनशिप अमेंटमेंट कायद्याच्या अंतर्गत येते. प्रधानमंत्री सीएएवर स्पष्टतेने बाेलतात परुंतु एनपीआर आणि एनआरसीवर बाेलण्यास तयार नाहीत. 

श्रीलंकेचे अनेक तमिळ हिंदू नागरिकत्व मागतायेत त्यांना सरकार का नागरिकत्व देत नाही ? असा प्रश्न देखील यादव यांनी उपस्थित केला. तसेच स्वामी विवेकानंद यांनी शिकागाेमध्ये म्हंटले हाेते की या देशात शरणागती मागणाऱ्या प्रत्येकाला या देशाने नागरिकत्व द्यायला हवे. भाजपा विवेकानंद यांच्या विचारांना माननार आहे की नाही असेही ते यावेळी म्हणाले. शाहीनबागच्या आंदाेलनाबाबत बाेलताना ते म्हणाले, नागरिकांना कमीत कमी त्रास हाेईल अशा पद्धतीने आंदाेलन करायला हवे. यावर मार्ग काढता येऊ शकताे. सीएए रद्द करता येणार नाही असा सर्वाेच्च न्यायालयाने म्हंटले आहे या प्रश्नावर बाेलताना ते म्हणाले हा सर्वाेच्च न्यायालयाची परीक्षा पाहणारा कायदा आहे. 

राज्य सरकारच्या चारित्र्य पडताळण्याची ही वेळमहाराष्ट्र सराकरचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यासाेबत मंचावर येत सीएए, एनआरसीला विराेध केला. परंतु राज्य सरकारने सीएएच्या बाजूने परिपत्रक काढले. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच तसे परिपत्रक काढावे अशी मागणी यादव यांनी केली. तसेच ही राज्य सरकारच्या चारित्र्य पडताळणीची वेळ असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा