शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख : याेगेंद्र यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:10 IST

माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख असल्याची घाणाघाती टीका याेगेंद्र यादव यांनी केली.

पुणे : हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन हिंसाचार घडवणे हा सर्वात माेठा देशद्राेह आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शहा हे खरे तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख आहेत अशा शब्दात स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख याेगेंद्र यादव यांनी माेदी आणि शहा यांच्यावर टीका केली. 

पुण्यातील काेंढवा भागात सुरु असलेल्या प्रती शाहीनबाग आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठी यादव आज पुण्यात आले हाेते. यावेळी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विराेधात भारत जाेडाे आंदाेलन करण्यात येणार असून 22 फ्रेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जागृती करणार असल्याचेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. 

यादव म्हणाले, सीएए, एनआरसी यांना विराेध करण्यासाठी 'हम भारत के लाेग' ही चळवळ उभी करण्यात आली. या चळवळीत आता 125 हून अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. हे केवळ मुस्लिम समाजाचे नाही तर सर्वच समाजाचे आंदाेलन झाले आहे. तरुण माेठ्या संख्येने या कायद्यांच्या विराेधात रस्त्यावर उतरले आहेत. याचे आता 'भारत जाेडाे' या आंदाेलनात आम्ही रुपांतर करत आहाेत. ते ताेडायचे काम करतील आम्ही जाेडायचे काम करु. भारत जोडो हे आंदोलन हे एका नवीन भारताच्या निर्मिती चे आंदोलन असणार आहे. एन पी आरच्या माध्यमातून एनआरसी आणले जात आहे. एनपीआर आणि जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. जनगनणेचा वेगळा कायदा आहे. एनपीआर हे सिटीझनशिप अमेंटमेंट कायद्याच्या अंतर्गत येते. प्रधानमंत्री सीएएवर स्पष्टतेने बाेलतात परुंतु एनपीआर आणि एनआरसीवर बाेलण्यास तयार नाहीत. 

श्रीलंकेचे अनेक तमिळ हिंदू नागरिकत्व मागतायेत त्यांना सरकार का नागरिकत्व देत नाही ? असा प्रश्न देखील यादव यांनी उपस्थित केला. तसेच स्वामी विवेकानंद यांनी शिकागाेमध्ये म्हंटले हाेते की या देशात शरणागती मागणाऱ्या प्रत्येकाला या देशाने नागरिकत्व द्यायला हवे. भाजपा विवेकानंद यांच्या विचारांना माननार आहे की नाही असेही ते यावेळी म्हणाले. शाहीनबागच्या आंदाेलनाबाबत बाेलताना ते म्हणाले, नागरिकांना कमीत कमी त्रास हाेईल अशा पद्धतीने आंदाेलन करायला हवे. यावर मार्ग काढता येऊ शकताे. सीएए रद्द करता येणार नाही असा सर्वाेच्च न्यायालयाने म्हंटले आहे या प्रश्नावर बाेलताना ते म्हणाले हा सर्वाेच्च न्यायालयाची परीक्षा पाहणारा कायदा आहे. 

राज्य सरकारच्या चारित्र्य पडताळण्याची ही वेळमहाराष्ट्र सराकरचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यासाेबत मंचावर येत सीएए, एनआरसीला विराेध केला. परंतु राज्य सरकारने सीएएच्या बाजूने परिपत्रक काढले. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच तसे परिपत्रक काढावे अशी मागणी यादव यांनी केली. तसेच ही राज्य सरकारच्या चारित्र्य पडताळणीची वेळ असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा