शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मॉडर्न वटपोर्णिमा : नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 07:00 IST

वडाच्या झाडाची फांदी तोडून पूजा करावी असे कुठल्याही धर्मशास्त्रात सांगितलेले नाही...

ठळक मुद्दे हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ‘वटपौर्णिमा’ म्हणून केली जाते साजरी

अतुल चिंचलीलोकमत न्यूज नेटवर्क पुणे:  वडाच्या झाडाची फांदी तोडून पूजा करावी असे कुठल्याही धर्मशास्त्रात सांगितलेले नाही. मात्र, शहरीकरणाच्या युगात वडाच्या झाडापर्यंत पोहोचणे अवघड झाल्याने अनेकजणी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वडाच्या फांद्या विकत घेतात. नवऱ्याचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि पुढचे सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी साजऱ्या होणारी ही ‘मॉडर्न वटपौर्णिमा’ वटवृक्षांचा बळी घेणारी ठरु लागली आहे.       हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. यादिवशी विवाहित स्त्रिया पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्यी मिळावे म्हणून वडाला पुजतात. मात्र वडाचे झाड शहरीकरणात दुर्मिळ झाले आहे. वडाचे झाड गाठण्यासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागतो. यावर पर्याय म्हणून घरातच वडाची फांदी आणून ती पुजण्याची प्रथा पडू लागली आहे.   वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शहरांमधल्या मंडईत वडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. वटपौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर या फांद्या तोडल्या जातात. सिंहगड रस्ता, धायरी, खडकवासला तसेच घाट परिसरातल्या वडाच्या फांद्या पुण्यात विक्रीस आणल्या जातात. वटपौर्णिमेच्या पूजा साहित्यबरोबरच या फांद्यांची विक्री केली जाते. प्रत्येक फांदी दहा रुपये दराने विकली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळपर्यंत या फांद्याची विक्री चालू असते. विकल्या न गेलेल्या फांद्यांचा पुढे काहीही उपयोग होत नसल्याने त्या फेकून दिल्या जातात.चौकटतोडण्यापेक्षा लागवड करा‘‘वडाचे झाड जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन देते. तो आपल्याला मिळावा या हेतूने वडाला फेºया मारण्याची प्रथा पडली. वडाच्या फांद्या घरी घेऊन जाण्याने, त्याची पूजा करुन ती फेकुन दिल्याने हा लाभ मिळत नाही. उलट झाडाची हानी होते. याबाबत स्थानिक वृक्षप्राधिकरण आणि जैवविविधता मंडळ यांनी कायदे केले पाहिजेत. झाडांना अपाय करून व त्यांची पूजा करून झाड प्रसन्न होणार नाही. सध्या शहरात सर्व ठिकाणी हिरवाई वाढवणे गरजेचे आहे. स्त्रियांनी सरकारी किंवा खाजगी वनखात्यातून वडाची रोपे घेतली पाहिजेत. या रोपांची पूजा करुन पुजेनंतर ते रोप घरासमोर, परिसरात लावून वडाला जीवनदान द्यायला हवे.’’ -डॉ सचिन पुणेकर, पर्यावरणतज्ञ चौकट फांद्याना मोठी मागणी‘‘आम्ही दोन दिवसासाठी १०० ते १२० फांद्या आणतो. शहरात वडाच्या फांदीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शहरातून फांद्या तोडून दिल्या जात नाहीत म्हणून शहराबाहेरुन फांद्या तोडून आणतो. मंडई व पिंपरी चिंचवडमध्ये फांद्यांची विक्री होते. एक विक्रेता दोन दिवसात शंभर-दीडशे फांद्या विकतो.’’ -राजीव गाजरे, विक्रेता      चौकट वडाचे महत्त्व निसर्गत:च दीघार्युषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांच्या पूजनाची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली. वड मोठयाा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करते. वडाची झाडे आधिक प्रमाणात असणाऱ्या प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पर्यावरण रक्षणात वड महत्त्वपूर्ण आहे.वटवृक्ष हा आपला ‘राष्ट्रीय वृक्ष’ आहे. मात्र वाढत्या शहरीकरणमुळे वडासाहित अनेक देशी वृक्ष तोडले जात असल्याने पशु-पक्ष्यांचा निवारा नष्ट होतो आहे. 

    

टॅग्स :PuneपुणेenvironmentवातावरणWomenमहिला