शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आघाडीच्या अपेक्षेने मनसेतील इच्छुक लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 17:57 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता.

मुंबई - मागील आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमनसेने एकत्र लढावे, या संदर्भातही राज व सोनिया गांधी यांची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नव्या समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडी लक्षात घेत, आघाडीच्या अपेक्षेने मनसेतील इच्छुक सुद्धा आता कामाला लागले आहेत. तर मनसेमधील नेत्यांनी आपल्या मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी सुद्धा सुरु केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. मनसेला आघाडीत घेण्याची खात्री असल्याने आता मनसेमधील इच्छुक सुद्धा कामाला लागले आहेत. पक्षातील इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढणे सुरु केले आहेत. मतदार संघातील मतांची आकडेवारी,जातीय समीकरण याचा आढावा घेणे सुरु केले आहे. तर जागावाटपच्यावेळी आपला मतदारसंघ मनसेलाच सुटणार असे दावे सुद्धा अनेकांनी सुरु केले आहे.

लोकसभा निवडणुकीत राज यांच्या सभेमुळे मोदींच्या विरोधात एक वातावरण निर्माण झाले होते . त्यांच्या सभेला मोठी गर्दी सुद्धा पहायला मिळायची. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज यांच्या आक्रमकतेचा फायदा आघाडीला होऊ शकतो हे लक्षात घेत, त्यांना महाआघाडीत घेण्याची मागणी राष्ट्रवादी आणि  काँग्रेसमधील नेत्यांकडून होत आहे.

विजय चव्हाण ( मनसे जिल्हाध्यक्ष औरंगाबाद )

विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मनसेमधील इच्छुकांनी भेटीगाठी सूर केल्या आहेत. स्वताः राज ठाकरे यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही काम सुरु केले आहेत. आघाडीत गेलो तर आम्हाला काही जागा मिळतीलच आणि नाही गेलो तरीही निवडणूक लढणार अहोतोच, असे औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष  विजय  चव्हाण लोकमतशी बोलताना  म्हणाले.