शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काहीही झालं तरी राज साहेबांसोबतच; औरंगाबाद मनसैनिकांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:42 IST

वरिष्ठांचा काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याचे सुद्धा गौतम अमराव म्हणाले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मनसेने तटस्थ राहत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काय भूमिका असणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. मात्र मनसेने विधानसभा निवडणुका लढवली किंवा लढवली नाही, तरीही आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचा खुलासा औरंगाबदचे मनसे जिल्हाप्रमुख गौतम अमराव यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मनसेने आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतला तरीही आम्ही पक्षाचे काम करत राहणार आहोत, असे अमराव म्हणाले.

त्याच बरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष वाढवण्याचे काम सुरु असून, शहरातील मनसेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा खोटी असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीत बाबत राज ठाकरे जो आदेश देतील, त्याप्रमाणे पक्षासाठी काम करणार आहोत. त्यामुळे वरिष्ठांचा काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याचे सुद्धा गौतम अमराव म्हणाले.