शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

मुंबई- महाराष्ट्र आधीपासूनच महान, परप्रांतीयांची गरज नाही, मनसेचं मुख्यमंत्र्यांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 11:57 IST

उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपलं योगदान देऊन मुंबईला महान बनवलं, मुंबईचा गौरव वाढवला असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

ठळक मुद्देउत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपलं योगदान देऊन मुंबईला महान बनवलं, मुंबईचा गौरव वाढवला असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

मुंबई-  उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राच्या वैभवात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपलं योगदान देऊन मुंबईला महान बनवलं, मुंबईचा गौरव वाढवला असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार टीका केली आहे. 'मुंबई आणि महाराष्ट्र यापूर्वीही महान होता, आहे आणि राहील. महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही,' असं उत्तर मनसेने दिलं आहे.  मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. 

'महाराष्ट्र परप्रांतीयांमुळं महान होतो आहे, मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळं ते येतात. आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसं बनवू शकतात,' असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी विचारला आहे.

'मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे परप्रांतीयांच्या मतांसाठी खटाटोप आहे. यामागे दुसरा-तिसरा काही हेतू नाही. यापूर्वी हे काँग्रेस करत होती. आता भाजपा करते आहे. 'पार्टी विथ द डिफरन्स' वगैरे काही नाही,' असं नितीन सरदेसाई यांनी म्हंटलं. 'सत्तेत असलेली लोक त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडत नाहीत म्हणून मनसेला मराठी माणसाचा, मराठी भाषेचा मुद्दा उचलावा लागतो,' असंही नितीन सरदेसाई यांनी म्हंटलं. 

टॅग्स :MNSमनसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेNitin Sardesaiनितीन सरदेसाई