शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Raj Thackeray : मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 21:09 IST

MNS Raj Thackeray Slams Uddhav Thackeray : "कोकणासारख्या भागात आम्ही भांडतोय, वाद चालू आहे. नवीन बारसू कुठून आलं?, मला वाटलं नाणारचं नाव बदललं."

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत आज सभा झाली. "मी कोकणच्या दौऱ्यावर आलो असताना मी सभा घेणार असल्याचं सांगितलं होतं. पहिल्यांदा रत्नागिरी शहर निवडू असं म्हटलं. कोकणासारख्या भागात आम्ही भांडतोय, वाद चालू आहे. नवीन बारसू कुठून आलं?, मला वाटलं नाणारचं नाव बदललं. तुमच्या पायाखालून जमीन निसटून जाते. समजत नाही तुम्हाला?, कोणतरी विकत घेतंय. लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं. व्यापार चालू आहे सगळा... जमीन विकताना कळलं नाही का तुम्हाला?" असा सवाल राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केला आहे. 

बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बारसूच्या दौऱ्यावर आहेत. हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, असं आव्हान ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष येऊन गेले. आता सांगतात जी लोकांची भावना ती आमची भावना" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"बाळासाहेबांच्या नावाने मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापला का? लोक निवडून देतात तेव्हा लोकांचं हित पाहिलंच पाहिजे. लोकांची काळजी घ्यायची असते. हे लोकं लोकांना फसवत आले, मूर्ख बनवत आले. ही माणसं कधी प्रदेशाची धूळधाण करतील हे समजणार नाही. या सर्वातून माझा कोकण वाचवा आणि मी सांगितलेल्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. "दुसरीकडे राजीनाम्याचा विषय सुरू होता तो काल संपला. त्यांना खरंच राजीनामा द्यायचा होता असं मला वाटतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार ज्याप्रकारे वागले ते पवारांच्या डोळ्यादेखत होत असताना मी आता राजीनामा दिला हे असं वागतायत. उद्या ते जसं बोलत होते तसं मलाही सांगतील या भीतीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा. होतंय ते बरं होतंय अशा उकळ्या फुटत होत्या. पण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे" असं राज ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे