शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

लेख: धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय?, महाराष्ट्राचं 'राज'कारण नीट समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 15:31 IST

राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him"

- संदीप देशपांडे

२ एप्रिल २०२२ ची राजसाहेबांची गुढी पाडव्याची सभा ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरली. शिवतीर्थावरच्या या सभेनंतर अनेक ऊलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मनसे हा संपलेला पक्ष आहे, आम्ही सुपारी घेतलेली आहे, मनसे नेहमी भूमिका बदलते, राजसाहेब हे सभा घेतात आणि मग गायब होतात अश्या अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him" त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही म्हणण्याऱ्या जाणता राजांना पत्रकार परिषद आणि प्रत्येक भाषणात उत्तर द्यावं लागलं. शिवसेनेची  तर अवस्था अशी झाली होती ती की, "रामचंद्र कहे गये सिया से ऐसा कलयुग आयेगा शिव की सेना कहेलेने वाला हनुमान चालीसा से डर जयेगा" 

12 एप्रिलला ठाण्यात राजसाहेबांची उत्तरसभा झाली त्या सभेत महाविकास आघाडीचे वाभाडे काढले आणि त्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे हनुमान चालीसा आणि भोंगे या दोन शब्दांच्या भोवतीच फिरत आहे. असो. मला या सगळ्यात एक प्रश्न पडतो तो असा की, आमच्यावर आरोप होतो की राजसाहेब हे धार्मिक तेढ पसरवण्याचं काम करतायत. मुळात प्रश्न असा आहे की आम्ही म्हणतोय 2005च्या सर्वोच न्यायालयाच्या आणि विविध उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. पण काही लोक म्हणतात की आम्ही या आदेशाचं पालन करणार नाही मग तेढ कोण निर्माण करतंय. आदेशाचं पालन करा म्हणणारे की करणार नाही म्हणणारे? 

महाराष्ट्र सरकार हे जगातलं एकमेव सरकार आहे जिथे जनता म्हणते कायद्याचे पालन झाले पाहिजे आणि सरकार म्हणते कायद्याचे पालन करणार नाही किमान या गोष्टीसाठी जागतिक  स्तरावर महाविकास आघाडी सरकारचा सत्कार व्हायला हवा. दुसरा प्रश्न विचारला जातो महागाई आणि पेट्रोल-डिझेल दरवाढ या विषयावर राजसाहेब का बोलत नाही, आमचा त्यांना प्रश्न आहे सगळ्यावर आम्हीच बोलायचं तर मग तुम्ही काय फक्त टेंडर मधील कमिशन खाणार? आणि तुमचे संसदेत निवडून गेलेले खासदार काय अंडी उबवणार?राज्यसरकारनी महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना केल्या?मुळात ज्या राज्याचे मुख्यमंत्री दोन वर्षांनी मंत्रालयात गेले म्हणून हेडलाईन होते तिथून काय अपेक्षा ठेवणार? कोविडकाळात सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी बेदखल होतं, मुख्यमंत्री कुणाला भेटत नव्हते, तेव्हा प्रश्न मार्गी लागावे म्हणून लोक कृष्णकुंजवर यायचे. खरे सांगायचे तर मुख्यमंत्र्यांनी कोविडकाळाचं कारण पुढे करून लोकांची सहानुभूती मिळवण्याच प्रयत्न केला. आणखी एक आरोप म्हणजे राजसाहेब दुसऱ्या कुणाची तरी भाषा बोलतात त्याबद्दल एवढंच सांगीन की "राजसाहेब कुण्याच्या खांद्यावरून ना कधी बंदूक चालवत ना कुणाला स्वतःचा खांदा बंदूक चालवायला देतात. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एवढ्या कोलांट उड्या मारल्यात की मनसेबद्दल बोलायचा नैतिक अधिकार एकालाही नाही. राहता राहिला प्रश्न भाजप आणि मनसे युतीचा तर काळाच्या पोटात काय दडलंय हे कोणीही सांगू शकत नाही! 

(लेखक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत )

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरे