शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लेख: धार्मिक तेढ कोण निर्माण करतंय?, महाराष्ट्राचं 'राज'कारण नीट समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 15:31 IST

राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him"

- संदीप देशपांडे

२ एप्रिल २०२२ ची राजसाहेबांची गुढी पाडव्याची सभा ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरली. शिवतीर्थावरच्या या सभेनंतर अनेक ऊलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मनसे हा संपलेला पक्ष आहे, आम्ही सुपारी घेतलेली आहे, मनसे नेहमी भूमिका बदलते, राजसाहेब हे सभा घेतात आणि मग गायब होतात अश्या अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण राजसाहेबांबद्दल एक गोष्ट नक्की आहे " you can love him you can hate him but you can not ignore him" त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही म्हणण्याऱ्या जाणता राजांना पत्रकार परिषद आणि प्रत्येक भाषणात उत्तर द्यावं लागलं. शिवसेनेची  तर अवस्था अशी झाली होती ती की, "रामचंद्र कहे गये सिया से ऐसा कलयुग आयेगा शिव की सेना कहेलेने वाला हनुमान चालीसा से डर जयेगा" 

12 एप्रिलला ठाण्यात राजसाहेबांची उत्तरसभा झाली त्या सभेत महाविकास आघाडीचे वाभाडे काढले आणि त्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे हनुमान चालीसा आणि भोंगे या दोन शब्दांच्या भोवतीच फिरत आहे. असो. मला या सगळ्यात एक प्रश्न पडतो तो असा की, आमच्यावर आरोप होतो की राजसाहेब हे धार्मिक तेढ पसरवण्याचं काम करतायत. मुळात प्रश्न असा आहे की आम्ही म्हणतोय 2005च्या सर्वोच न्यायालयाच्या आणि विविध उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. पण काही लोक म्हणतात की आम्ही या आदेशाचं पालन करणार नाही मग तेढ कोण निर्माण करतंय. आदेशाचं पालन करा म्हणणारे की करणार नाही म्हणणारे? 

महाराष्ट्र सरकार हे जगातलं एकमेव सरकार आहे जिथे जनता म्हणते कायद्याचे पालन झाले पाहिजे आणि सरकार म्हणते कायद्याचे पालन करणार नाही किमान या गोष्टीसाठी जागतिक  स्तरावर महाविकास आघाडी सरकारचा सत्कार व्हायला हवा. दुसरा प्रश्न विचारला जातो महागाई आणि पेट्रोल-डिझेल दरवाढ या विषयावर राजसाहेब का बोलत नाही, आमचा त्यांना प्रश्न आहे सगळ्यावर आम्हीच बोलायचं तर मग तुम्ही काय फक्त टेंडर मधील कमिशन खाणार? आणि तुमचे संसदेत निवडून गेलेले खासदार काय अंडी उबवणार?राज्यसरकारनी महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना केल्या?मुळात ज्या राज्याचे मुख्यमंत्री दोन वर्षांनी मंत्रालयात गेले म्हणून हेडलाईन होते तिथून काय अपेक्षा ठेवणार? कोविडकाळात सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी बेदखल होतं, मुख्यमंत्री कुणाला भेटत नव्हते, तेव्हा प्रश्न मार्गी लागावे म्हणून लोक कृष्णकुंजवर यायचे. खरे सांगायचे तर मुख्यमंत्र्यांनी कोविडकाळाचं कारण पुढे करून लोकांची सहानुभूती मिळवण्याच प्रयत्न केला. आणखी एक आरोप म्हणजे राजसाहेब दुसऱ्या कुणाची तरी भाषा बोलतात त्याबद्दल एवढंच सांगीन की "राजसाहेब कुण्याच्या खांद्यावरून ना कधी बंदूक चालवत ना कुणाला स्वतःचा खांदा बंदूक चालवायला देतात. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एवढ्या कोलांट उड्या मारल्यात की मनसेबद्दल बोलायचा नैतिक अधिकार एकालाही नाही. राहता राहिला प्रश्न भाजप आणि मनसे युतीचा तर काळाच्या पोटात काय दडलंय हे कोणीही सांगू शकत नाही! 

(लेखक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत )

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेRaj Thackerayराज ठाकरे