शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 11:30 IST

Raj Thackeray Yavatmal : "ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी सांगितलं आम्हाला, ना कधी आम्हाला बाबासाहेबानी सांगितलं, ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं, ना आमच्या कुठल्याही साधू-संतांनी सांगितलं. हे आता सुरू झाले आहे. कारण..."

गेल्या दहा-पंधरा-वीस वर्षात महाराष्ट्रात स्वतःच्या जातीबद्दलच्या प्रेमापेक्षा दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष पसरवला गेला. असा महाराष्ट्र कधी नव्हता. ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी सांगितलं आम्हाला, ना कधी आम्हाला बाबासाहेबानी सांगितलं, ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं, ना आमच्या कुठल्याही साधू-संतांनी सांगितलं. हे आता सुरू झाले आहे. कारण आमच्याकडे एक संत जन्माला आले आहेत, त्याचे नाव शरद चंद्र पवार. त्या संताने हे सगळं विष पेरलं, असे म्हणत राज ठाकरे यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते यवतमळमधील राळेगाव येथे पक्षाच्या प्रचारसभेत बोलत होते.

जातीपातीच्या राजकारणासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, "आज आम्ही महाराष्ट्रात गुंतलोय कशा मध्ये? आम्हाला गुंतवून टाकतायत कशा मध्ये? तर जातीपाती मध्ये. आज प्रत्येकाची ओळख कशामध्ये तर जातीमध्ये. जात काय? यापूर्वीही जाती होत्या. मला आता माहिती नाही, येथे व्यासपीठ माझ्यासोबत बसलेले माझे सहकारी कोणत्या जातीचे आहेत? मला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. पण स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणे हे स्वाभाविक, वर्षानुवर्षे होत आले आहे. पण गेले दहा-पंधरा-वीस वर्षात महाराष्ट्रात स्वतःच्या जातीबद्दलच्या प्रेमापेक्षा दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष पसरवला गेला. असा महाराष्ट्र कधी नव्हता."

...कारण आमच्याकडे एक संत जन्माला आले -पुढे राज म्हणाले, "ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी सांगितलं आम्हाला, ना कधी आम्हाला बाबासाहेबानी सांगितलं, ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं, ना आमच्या कुठल्याही साधू-संतांनी सांगितलं. हे आत्ता सुरू झाले आहे. कारण आमच्याकडे एक संत जन्माला आले आहेत, त्याचे नाव शरद चंद्र पवार. त्या संताने हे सगळं विष पेरलं. हा महाराष्ट्र हिंदुत्वाने जो भरावला होता, ते भरावलेलं हिंदुत्व तोडण्याचं काम जातीतून करायचं, हे त्यांनी सुरू केलं." 

"हाताला काही लागणार नाही बाबानो आपल्या. या घाणेरड्या गोष्टींमध्ये तुम्ही तरी पडू नका कुणी. महाराष्ट्र तर अजिबात पडता कामा नाही. या सगळ्या जातीपातीच्या पलीकडे मला वाटते की, माझा तरुण मोठा झाला पाहिजे, माझे तरुणी मोठ्या झाल्या पाहिजे, असेही राज म्हणाले. 

...यातून आमची महाराष्ट्रातील लोकांबद्दल, महाराष्ट्राच्या आपल्या भूमींबद्दलची आस्था लक्षात येते -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विकास आराखड्यासंदर्भात बोलताना राज म्हणाले, "महाराष्ट्राला माझी हाक आहे, विनंती आहे, माझी काही स्वप्न आहेत महाराष्ट्राबद्दलची, माझ्या काही कल्पना आहेत. मी जग फिरलेला माणूस आहे, 2014 ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा हा पहिला राजकीय पक्ष आहे (महाराष्ट्र नव निर्माण सेना). स्वातंत्र्यापासून आजपर्यंत, एकाही राजकीय पक्षाने या देशातले, या महाराष्ट्रातले प्रश्न कसे सुटतील, यावर आजपर्यंत कोणी काहीही बोलले नव्हते. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले. यातून आमची महाराष्ट्रातील लोकांबद्दल, महाराष्ट्राच्या आपल्या भूमींबद्दलची आस्था लक्षात येते."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेYavatmalयवतमाळ