शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

"पद मिळालं म्हणून अक्कल येत नाही, यांचे नेते..."; अंबादास दानवेंवर मनसेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:49 IST

पुढच्या अधिवेशनापर्यंतच तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंकडे आहे. त्यांना नैराश्य आलेले आहे असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर - Prakash Mahajan on Ambadas Danvey ( Marathi News ) नैतिकतेचा अंबादास दानवे आणि त्यांचा पक्षाचा काही संबंध नाही. पद मिळालं म्हणून माणसाला अक्कल येते असं नाही. अंबादास दानवेंची बौद्धिक क्षमता नाही अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दानवेंनी मनसेवर टीका केली होती. त्याला महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. 

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, हिंदुत्वाच्या भूमिकेतून एखादं राजकारण होत असेल तर गैर काय? भाजपा-मनसेची युती नैसर्गिक युती ठरेल. हिंदुत्वाची भूमिका असेल. युती झाली तर वावगं काय?. काँग्रेससोबत जाण्यापेक्षा दुकान बंद करेन असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत गेलात, तुम्ही दुसऱ्यांना बोलावं हा अधिकार काय? शरद पवारांनी तिरस्काराने सांगितले होते, शिवसेनेसोबत युती छे छे आम्ही करणार नाही. त्या शरद पवारांसोबत तुम्ही गेलात ना...अंबादास दानवेंची बौद्धिक क्षमता नाही. त्यांना खासदारकी लढवायची आहे त्या मार्गात खैरे आडवे येतायेय त्यामुळे दानवेंना नैराश्य आलंय. तुमच्या दोघांचे पाहून घ्या. उद्धव ठाकरे तुमच्या दोघांपैकी कुणाला तुकडा टाकणार तेच चघळत बसा, तुम्ही आमची काळजी करू नका असं त्यांनी बजावलं. 

तसेच अंबादास दानवेंनी त्यांच्या लायकीप्रमाणे बोलले. यांचा नेता दिल्लीत इतक्या वेळा चक्करा मारतोय ते कुणाचे काय धरायला चक्करा मारतोय हे सांगावे. मध्यंतरी सिनेतारकाच्या कथित आत्महत्या प्रकरणी माझ्या मुलाला वाचवा यासाठी कोण दिल्लीला गेले होते, कुणाचे पाय धरले होते. अंबादास दानवेंनी अंतर्मुख होऊन पाहायला पाहिजे यांचा नेता कुणाचे काय काय धरतोय. शिवाजी पार्कवर कुणीही ठाकरे उपस्थित असतो तेव्हा ठाकरेच शेवटी बोलतात. परवाच्या सभेत उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या आधी बोलले हे दानवेंनी पाहावे. चंद्रकांत खैरे त्यांच्या मार्गात अडथळा आणतायेत त्यांना पाहावे. आमचं कशाला पाहतो असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं. 

दरम्यान, पुढच्या अधिवेशनापर्यंतच तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंकडे आहे. राज ठाकरे कुणाचे पाय धरायला जात नाहीत. राज ठाकरे मैत्रीला जागणारे आहेत म्हणून लोक त्यांच्या घरी जातात. दानवेंचे साहेब दिल्लीत कुणाचे पाय धरायला गेले होते ते पाहावे. अंबादास दानवेने पातळी सोडल्यावर मी कशाला पातळी सांभाळू.  हिंदु्त्व आम्ही सोडलं नव्हते. पण ज्यावेळी आम्ही जाहीर भूमिका घेतली. त्यातून एखादे राजकारण होत असेल तर त्यात गैर काय, या लोकांनी राजकारण केले नाही का? असा सवालही प्रकाश महाजन यांनी विचारला.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाAmbadas Danweyअंबादास दानवे