शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

"पद मिळालं म्हणून अक्कल येत नाही, यांचे नेते..."; अंबादास दानवेंवर मनसेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:49 IST

पुढच्या अधिवेशनापर्यंतच तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंकडे आहे. त्यांना नैराश्य आलेले आहे असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर - Prakash Mahajan on Ambadas Danvey ( Marathi News ) नैतिकतेचा अंबादास दानवे आणि त्यांचा पक्षाचा काही संबंध नाही. पद मिळालं म्हणून माणसाला अक्कल येते असं नाही. अंबादास दानवेंची बौद्धिक क्षमता नाही अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दानवेंनी मनसेवर टीका केली होती. त्याला महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. 

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, हिंदुत्वाच्या भूमिकेतून एखादं राजकारण होत असेल तर गैर काय? भाजपा-मनसेची युती नैसर्गिक युती ठरेल. हिंदुत्वाची भूमिका असेल. युती झाली तर वावगं काय?. काँग्रेससोबत जाण्यापेक्षा दुकान बंद करेन असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत गेलात, तुम्ही दुसऱ्यांना बोलावं हा अधिकार काय? शरद पवारांनी तिरस्काराने सांगितले होते, शिवसेनेसोबत युती छे छे आम्ही करणार नाही. त्या शरद पवारांसोबत तुम्ही गेलात ना...अंबादास दानवेंची बौद्धिक क्षमता नाही. त्यांना खासदारकी लढवायची आहे त्या मार्गात खैरे आडवे येतायेय त्यामुळे दानवेंना नैराश्य आलंय. तुमच्या दोघांचे पाहून घ्या. उद्धव ठाकरे तुमच्या दोघांपैकी कुणाला तुकडा टाकणार तेच चघळत बसा, तुम्ही आमची काळजी करू नका असं त्यांनी बजावलं. 

तसेच अंबादास दानवेंनी त्यांच्या लायकीप्रमाणे बोलले. यांचा नेता दिल्लीत इतक्या वेळा चक्करा मारतोय ते कुणाचे काय धरायला चक्करा मारतोय हे सांगावे. मध्यंतरी सिनेतारकाच्या कथित आत्महत्या प्रकरणी माझ्या मुलाला वाचवा यासाठी कोण दिल्लीला गेले होते, कुणाचे पाय धरले होते. अंबादास दानवेंनी अंतर्मुख होऊन पाहायला पाहिजे यांचा नेता कुणाचे काय काय धरतोय. शिवाजी पार्कवर कुणीही ठाकरे उपस्थित असतो तेव्हा ठाकरेच शेवटी बोलतात. परवाच्या सभेत उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या आधी बोलले हे दानवेंनी पाहावे. चंद्रकांत खैरे त्यांच्या मार्गात अडथळा आणतायेत त्यांना पाहावे. आमचं कशाला पाहतो असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं. 

दरम्यान, पुढच्या अधिवेशनापर्यंतच तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंकडे आहे. राज ठाकरे कुणाचे पाय धरायला जात नाहीत. राज ठाकरे मैत्रीला जागणारे आहेत म्हणून लोक त्यांच्या घरी जातात. दानवेंचे साहेब दिल्लीत कुणाचे पाय धरायला गेले होते ते पाहावे. अंबादास दानवेने पातळी सोडल्यावर मी कशाला पातळी सांभाळू.  हिंदु्त्व आम्ही सोडलं नव्हते. पण ज्यावेळी आम्ही जाहीर भूमिका घेतली. त्यातून एखादे राजकारण होत असेल तर त्यात गैर काय, या लोकांनी राजकारण केले नाही का? असा सवालही प्रकाश महाजन यांनी विचारला.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाAmbadas Danweyअंबादास दानवे