शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीवरील मोठा डाग, कधीही पुसता येणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 20:42 IST

Maharashtra News: अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी माफी देऊन त्यांना उपमुख्यमंत्री केले नसते, असा दावाही करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीनंतर आता मनसेने यात उडी घेतली असून, पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीवरचा मोठा डाग आहे. तो त्यांना कधीही पुसता येणार नाही, असे मत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे. 

देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा लागेल. पण यापूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेत काय घडले होते, नक्की कोणते मुद्दे होते, हे समजल्यावर त्यातून काही गोष्टी समोर येऊ शकतील, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले. 

विचार करून शरद पवार तीन दिवसात माघारी वळाले असावेत

शरद पवार माघारी का वळाले, असा सवाल प्रकाश महाजन यांना करण्यात आला. यावर, राष्ट्रवादीतील एका गटाने शरद पवार यांना पटवून दिले की, पावसात भिजवून जे कमावले, ते असा शपथविधी करुन जाऊ शकते. त्यांनीही विचार केला असेल की, एक डाग १९७८ चा आपण ४० वर्षापासून घेऊन वावरत आहोत. याचा विचार करुन शरद पवार तीन दिवसात माघारी वळाले असावेत, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला. 

दरम्यान, शरद पवारांना अंधारात ठेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात, हे न पचण्यासारखे आणि न पटण्यासारखे आहे. अजित पवार हे शरद पवारांना न विचारता करतील, यावर कोणाही विश्वास ठेवणार नाही. अजित पवारांनी शरद पवारांना न विचारता देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली, तर ते गद्दार आहेत. अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी त्यांना माफी देऊन उपमुख्यमंत्री केले नसते, असेही महाजन यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :MNSमनसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा