शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 08:18 IST

मनसे कार्यकर्ता जय मालोकर याच्या मृत्यूप्रकरणी जे कुणी दोषी असतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. मालोकर कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. 

मुंबई - जय मालोकर या तरुणाचा मृत्यू गंभीर मारहाणीमुळे झाला हे पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आलंय. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणी मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी राजकारण करू नये असं मोठं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील मनसेचा २३ वर्षीय कार्यकर्ता ज्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला असं दाखवले होते, मात्र पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये जयचा मृत्यू गंभीर मारहाण आणि दुखापतीमुळे झाल्याचं समोर आले. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी चित्र आहे. जयच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी आणि जयच्या मृत्यूची चौकशी या दोन्ही मागण्या सरकारने मंजूर केल्या पाहिजेत. याबाबत कुटुंबाने रितसर तक्रार पोलीस ठाण्यात द्यावी. मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा अशी आमची मागणी आहे. आम्हाला दोषी ठरवून जे काही गुन्हे असतील ते घेण्याची आमची तयारी आहे. परंतु यात जे कुणी दोषी असतील मग आम्ही असो वा त्यांच्यातील कुणी या प्रकरणी राजकारण करू नये. अमोल मिटकरी जर दोषी असेल तर त्याला भरचौकात फासावर द्या असं त्यांनी म्हटलं. 

मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...

तसेच जे कुणी आरोपी असतील. जय त्याठिकाणी आंदोलनात होते, तिथे त्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न झाला. पूर्ण सीसीटीव्ही फुटेज बघा, त्या विद्यार्थ्याने आमच्या वाहनावर हल्ला केला नव्हता. तो मागे उभा होता. परंतु त्याच्या मृत्यूच्या शेवटपर्यंत काय काय झाले हे सत्य कुटुंबासमोर आले पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शासन झाले पाहिजे. जय मालोकर कुटुंबाने जी मागणी केली ती रास्त असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यांच्या कुटुंबाला पूर्ण वेळ संरक्षण द्यावे अशी मागणीही आमदार अमोल मिटकरींनी केली. 

दरम्यान, मला यात राजकारण करायचं नाही. जय मालोकर हा विद्यार्थी होता. आमच्या वाहनावर हल्ला करण्याचा त्याचा हेतू नव्हता. पण कुणीतरी बैठकीत आले, आंदोलनानंतर जय नेमका कुणासोबत होता, कुठे कुठे त्याला नेले गेले या सर्व गोष्टीच्या चौकशीची मागणी कुटुंब करत असेल तर ती मागणी रास्त आहे. आम्हाला या प्रकरणी पक्षीय राजकारण करायचे नाही. जयला कुणी मारलं हे जनतेसमोर सत्य येऊ द्या. सर्वांचे कॉल डिटेल्स काढा. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, जय मालोकरच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे असं अमोल मिटकरींनी मागणी केली. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे