शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 08:18 IST

मनसे कार्यकर्ता जय मालोकर याच्या मृत्यूप्रकरणी जे कुणी दोषी असतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. मालोकर कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. 

मुंबई - जय मालोकर या तरुणाचा मृत्यू गंभीर मारहाणीमुळे झाला हे पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आलंय. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणी मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी राजकारण करू नये असं मोठं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील मनसेचा २३ वर्षीय कार्यकर्ता ज्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला असं दाखवले होते, मात्र पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये जयचा मृत्यू गंभीर मारहाण आणि दुखापतीमुळे झाल्याचं समोर आले. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी चित्र आहे. जयच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी आणि जयच्या मृत्यूची चौकशी या दोन्ही मागण्या सरकारने मंजूर केल्या पाहिजेत. याबाबत कुटुंबाने रितसर तक्रार पोलीस ठाण्यात द्यावी. मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा अशी आमची मागणी आहे. आम्हाला दोषी ठरवून जे काही गुन्हे असतील ते घेण्याची आमची तयारी आहे. परंतु यात जे कुणी दोषी असतील मग आम्ही असो वा त्यांच्यातील कुणी या प्रकरणी राजकारण करू नये. अमोल मिटकरी जर दोषी असेल तर त्याला भरचौकात फासावर द्या असं त्यांनी म्हटलं. 

मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...

तसेच जे कुणी आरोपी असतील. जय त्याठिकाणी आंदोलनात होते, तिथे त्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न झाला. पूर्ण सीसीटीव्ही फुटेज बघा, त्या विद्यार्थ्याने आमच्या वाहनावर हल्ला केला नव्हता. तो मागे उभा होता. परंतु त्याच्या मृत्यूच्या शेवटपर्यंत काय काय झाले हे सत्य कुटुंबासमोर आले पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शासन झाले पाहिजे. जय मालोकर कुटुंबाने जी मागणी केली ती रास्त असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यांच्या कुटुंबाला पूर्ण वेळ संरक्षण द्यावे अशी मागणीही आमदार अमोल मिटकरींनी केली. 

दरम्यान, मला यात राजकारण करायचं नाही. जय मालोकर हा विद्यार्थी होता. आमच्या वाहनावर हल्ला करण्याचा त्याचा हेतू नव्हता. पण कुणीतरी बैठकीत आले, आंदोलनानंतर जय नेमका कुणासोबत होता, कुठे कुठे त्याला नेले गेले या सर्व गोष्टीच्या चौकशीची मागणी कुटुंब करत असेल तर ती मागणी रास्त आहे. आम्हाला या प्रकरणी पक्षीय राजकारण करायचे नाही. जयला कुणी मारलं हे जनतेसमोर सत्य येऊ द्या. सर्वांचे कॉल डिटेल्स काढा. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, जय मालोकरच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे असं अमोल मिटकरींनी मागणी केली. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे