शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 08:18 IST

मनसे कार्यकर्ता जय मालोकर याच्या मृत्यूप्रकरणी जे कुणी दोषी असतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. मालोकर कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. 

मुंबई - जय मालोकर या तरुणाचा मृत्यू गंभीर मारहाणीमुळे झाला हे पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आलंय. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणी मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी राजकारण करू नये असं मोठं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील मनसेचा २३ वर्षीय कार्यकर्ता ज्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला असं दाखवले होते, मात्र पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये जयचा मृत्यू गंभीर मारहाण आणि दुखापतीमुळे झाल्याचं समोर आले. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी चित्र आहे. जयच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी आणि जयच्या मृत्यूची चौकशी या दोन्ही मागण्या सरकारने मंजूर केल्या पाहिजेत. याबाबत कुटुंबाने रितसर तक्रार पोलीस ठाण्यात द्यावी. मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा अशी आमची मागणी आहे. आम्हाला दोषी ठरवून जे काही गुन्हे असतील ते घेण्याची आमची तयारी आहे. परंतु यात जे कुणी दोषी असतील मग आम्ही असो वा त्यांच्यातील कुणी या प्रकरणी राजकारण करू नये. अमोल मिटकरी जर दोषी असेल तर त्याला भरचौकात फासावर द्या असं त्यांनी म्हटलं. 

मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...

तसेच जे कुणी आरोपी असतील. जय त्याठिकाणी आंदोलनात होते, तिथे त्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न झाला. पूर्ण सीसीटीव्ही फुटेज बघा, त्या विद्यार्थ्याने आमच्या वाहनावर हल्ला केला नव्हता. तो मागे उभा होता. परंतु त्याच्या मृत्यूच्या शेवटपर्यंत काय काय झाले हे सत्य कुटुंबासमोर आले पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शासन झाले पाहिजे. जय मालोकर कुटुंबाने जी मागणी केली ती रास्त असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यांच्या कुटुंबाला पूर्ण वेळ संरक्षण द्यावे अशी मागणीही आमदार अमोल मिटकरींनी केली. 

दरम्यान, मला यात राजकारण करायचं नाही. जय मालोकर हा विद्यार्थी होता. आमच्या वाहनावर हल्ला करण्याचा त्याचा हेतू नव्हता. पण कुणीतरी बैठकीत आले, आंदोलनानंतर जय नेमका कुणासोबत होता, कुठे कुठे त्याला नेले गेले या सर्व गोष्टीच्या चौकशीची मागणी कुटुंब करत असेल तर ती मागणी रास्त आहे. आम्हाला या प्रकरणी पक्षीय राजकारण करायचे नाही. जयला कुणी मारलं हे जनतेसमोर सत्य येऊ द्या. सर्वांचे कॉल डिटेल्स काढा. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, जय मालोकरच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे असं अमोल मिटकरींनी मागणी केली. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे