मराठवाडय़ात मनसेच्या मुलाखती
By Admin | Updated: September 16, 2014 02:15 IST2014-09-16T02:15:40+5:302014-09-16T02:15:40+5:30
मराठवाडय़ातून मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या 168 जणांनी सोमवारी औरंगाबादेत मुलाखती दिल्या.

मराठवाडय़ात मनसेच्या मुलाखती
औरंगाबाद : मराठवाडय़ातून मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या 168 जणांनी सोमवारी औरंगाबादेत मुलाखती दिल्या. यामध्ये चार माजी आमदारांचा समावेश आहे. औरंगाबाद वगळता उर्वरित सातही जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्या.
मुलाखती घेण्यासाठी राज पक्षाच्या इतर नेत्यांसह रविवारीच शहरात दाखल झाले होते. सकाळी 11 वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. सर्वात आधी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर एकापाठोपाठ लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. एकेका मतदारसंघातील इच्छुकांना एकाचवेळी समोर बसवून त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते. उमेदवारी का द्यावी किंवा पक्षासाठी तुमचे योगदान काय, हे विचारले जात होते. औरंगाबाद जिलतील इच्छुकांना आत बोलावल्यानंतर मात्र राज ठाकरे प्रकृती बरी नसल्याचे सांगून तेथून बाहेर पडले. त्यामुळे औरंगाबाद तसेच खान्देशातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती गटनेते बाळा नांदगावकर, आ. प्रवीण दरेकर, मंगेश सांगळे आदींनी घेतल्या. मुलाखतींसाठी सर्वच इच्छुक फाईल हातात घेऊन आले होते.
मुलाखत देणा:यांमध्ये हरिभाऊ लहाने, सुनील धांडे, रोहिदास चव्हाण आणि किसनराव काळे या माजी आमदारांचाही समावेश होता. याशिवाय जालना जिल्ह्यातील बाबासाहेब आकात, जे. के. जाधव यांनीही मुलाखती दिल्या.
चार विभागप्रमुखांसह 68 जण ‘मनसे’तून बाहेर
पिंपरी (जि. पुणो) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शहरातील अनधिकृत बांधकामाविषयीची भूमिका आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत पक्षाच्या स्थानिक पदाधिका:यांनी राजीनामा दिले आहेत. याबाबतची माहिती सदस्य अॅड. सुनील वाल्हेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवसांत राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे वाल्हेकर म्हणाल़ेवाल्हेकर यांच्यासह 4 विभागप्रमुख, 4 उपविभागप्रमुख यांच्यासह शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष आणि सदस्य, तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी अशा एकूण 68 जणांनी सोमवारी पक्षाकडे राजीनामा पाठविला आहे. ठाकरे यांची शहरातील अनधिकृत बांधकामाविषयीची भूमिका, स्थानिक नेत्यांकडून मिळणारी वागणूक आणि कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.