शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

Maharashtra Politics: “३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप”; मनसे नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 14:07 IST

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून मनसेकडून टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. मात्र, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मनसेने निशाणा साधला आहे. केवळ ३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा होता. यावर सगळे चिडीचूप आहेत, असे सांगत मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

परतीच्या पावसाने बळीराजावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ऐन दिवाळीत मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदतीची घोषणा केली, पण ती केवळ डोळे पुसण्यासारखेच ठरणार आहे. प्रत्यक्षात झालेले नुकसान हे न भरुन येणारे आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पवासाचा मोठा फटका बसल्याने दिवाळीचा सण गोड लागेना. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या एका शेतकरीपुत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पैसे नसल्याने दिवाळीला कपडे घेतले नाही, असं तो चिमुकला सांगतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कुटुंबीयांस सोशल मीडियातून मदतही मिळाली. यानंतर आता उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर गेले असून, यावरून मनसेच्या गजानन काळे यांनी टीका केली आहे. 

३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप

३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा ... आता मात्र सगळे चिडीचूप ..., असे ट्विट करत गजानन काळे यांनी अख्खी कार्यक्रम पत्रिकाच ट्विटरवर शेअर केली. तसेच शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही सडकून टीका केली. दिवाळी आली वाटले दानवे गोड बोलतील.. मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय आले दानवेना बद्घकोष्ठतेचा त्रास होवू लागला.. दिवाळीत फराळ पण खाऊ शकणार नाहीत असे दिसतेय..बरं मिलिंद नार्वेकर व पवारसाहेबांच्या बरोबर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री दिसले की मात्र तोंड शिवलेले असते. राहता राहिला प्रश्न उद्भव ठाकरे यांच्या दहशतीचा तर तो थापा ने केव्हाच निकाली काढला आहे.. विधानपरिषदेवर हे दानवे MIM च्या नगरसेवकांच्या जीवावर निवडून गेले आणि गप्पा हिंदुत्वाच्या मारतात हाच विनोद आहे.. लॉटरी मध्ये विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे तर वायफळ बडबड नका करू..बाकी शुभ दिपावली, असे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे. 

दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळताच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्रीच मतदारसंघातील पीडित शेतकरी कुटुंबीयांच्या बांधावर धाव घेतली. यावेळी, त्यांच्याशी संवाद साधत कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदतही देऊ केली. त्यांना दिवाळीसणासाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य मिठाई दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे