शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप”; मनसे नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 14:07 IST

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून मनसेकडून टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. मात्र, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मनसेने निशाणा साधला आहे. केवळ ३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा होता. यावर सगळे चिडीचूप आहेत, असे सांगत मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

परतीच्या पावसाने बळीराजावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ऐन दिवाळीत मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदतीची घोषणा केली, पण ती केवळ डोळे पुसण्यासारखेच ठरणार आहे. प्रत्यक्षात झालेले नुकसान हे न भरुन येणारे आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पवासाचा मोठा फटका बसल्याने दिवाळीचा सण गोड लागेना. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या एका शेतकरीपुत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पैसे नसल्याने दिवाळीला कपडे घेतले नाही, असं तो चिमुकला सांगतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कुटुंबीयांस सोशल मीडियातून मदतही मिळाली. यानंतर आता उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर गेले असून, यावरून मनसेच्या गजानन काळे यांनी टीका केली आहे. 

३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप

३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा ... आता मात्र सगळे चिडीचूप ..., असे ट्विट करत गजानन काळे यांनी अख्खी कार्यक्रम पत्रिकाच ट्विटरवर शेअर केली. तसेच शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही सडकून टीका केली. दिवाळी आली वाटले दानवे गोड बोलतील.. मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय आले दानवेना बद्घकोष्ठतेचा त्रास होवू लागला.. दिवाळीत फराळ पण खाऊ शकणार नाहीत असे दिसतेय..बरं मिलिंद नार्वेकर व पवारसाहेबांच्या बरोबर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री दिसले की मात्र तोंड शिवलेले असते. राहता राहिला प्रश्न उद्भव ठाकरे यांच्या दहशतीचा तर तो थापा ने केव्हाच निकाली काढला आहे.. विधानपरिषदेवर हे दानवे MIM च्या नगरसेवकांच्या जीवावर निवडून गेले आणि गप्पा हिंदुत्वाच्या मारतात हाच विनोद आहे.. लॉटरी मध्ये विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे तर वायफळ बडबड नका करू..बाकी शुभ दिपावली, असे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे. 

दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळताच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्रीच मतदारसंघातील पीडित शेतकरी कुटुंबीयांच्या बांधावर धाव घेतली. यावेळी, त्यांच्याशी संवाद साधत कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदतही देऊ केली. त्यांना दिवाळीसणासाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य मिठाई दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे