शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 13:49 IST

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत संजय राऊत आणि शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा काही महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यांची दोन भाकिते खरी ठरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे सांगितले जात आहे. 

राज ठाकरे दिवा शहरात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना सेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. आमचं राजकारण मिमिक्रीवर चालत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर बोलताना, आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिले होते. यानंतर जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, आता शरद पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. पण, कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज यांच्या दोन्ही विधानांची चर्चा आहे. 

राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना उपयोगी येईलच

दुसरीकडे, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत, राज साहेबांनी संजय राऊत यांना एकट्यात बोलण्याची सवय लावावी, असा सल्ला दिला होता, आज तो सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच....!!! असा टोला लगावला. तसेच याआधी रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणून उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. 

दरम्यान, भाजपने संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा, असे म्हणत निशाणा साधला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. तसेच सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता आणि अटक होताना भगवा गळ्यात कशाला?, अशी विचारणाही केली आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRaj Thackerayराज ठाकरेSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार