शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

सरकारला शाप लागतील; मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन राज ठाकरे बसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 21:35 IST

सरकारला फक्त खाबुगिरीत रस असल्याचा राज यांचा आरोप

पुणे: मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारवर बरसले आहेत. ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशांवर लाठीमार कसला करता?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मूकबधिरांना शिकण्याची, स्वत:च्या पायांवर उभं राहण्याची इच्छा आहे. शिक्षक मिळावेत, यासाठी ते आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्यांच्यावर लाठीमार करत आहे. या सरकारला नक्कीच त्या मुलांचे शाप लागतील, अशा शब्दांमध्ये राज यांनी सरकारला लक्ष्य केलं. राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या मुलांची भेटदेखील घेतली.मूकबधिरांना पोलिसांकडून मारहाण होते, ही गोष्ट अतिशय दुर्देवी असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 'मूकबधिरांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले, हा प्रश्न आहे. ज्यांनी हे आदेश दिले, त्यांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा घ्यावा,' अशी मागणी राज यांनी केली. आंदोलनकर्त्या मुलांच्या मागणीत चुकीचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'त्या मुलांना शिक्षण घ्यावंसं वाटतं आहे. त्यांना शिकायचं आहे. त्यासाठी त्यांना शिक्षक हवेत. त्यामध्ये चुकीचं काय?' असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही अधिकारी ऐकत नसतील, तर मग सरकारचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी विचारला. मूकबधीर मुलांची भेट घेतल्यानंतर राज यांनी फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार फक्त खाबुगिरीत गुंग आहे. त्यांना या मुलांशी काहीही देणंघेणं नाही. फक्त पैशांवर निवडणुका जिंकायच्या आणि पैसा कमवायचा हेच सुरू आहे. त्यामुळे आता या सरकारला आधीच्या सरकारला दोष देण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे सरकारवर बरसले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू, असंदेखील त्यांना सांगितलं. ठिय्या दिलेल्या मुलांची सोय करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस