शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे आता कोकण दौऱ्यावर; कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेऊन नारळ फोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 13:19 IST

२७ नोव्हेंबरला मुंबईतील मनसे पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडेल.

मुंबई - राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. गेल्या २ वर्षापासून कोविडमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यात राज्यातील सत्तांतरामुळे येत्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाचं अस्तित्व पणाला लागलं आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील काही महिन्यांपासून विविध बैठका, गाठीभेटी घेत वातावरण निर्मिती करत आहेत. विदर्भ दौऱ्यानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात खंड पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे दौऱ्यावर निघाले आहेत. राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. 

याबाबत स्वत: राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले की, २७ नोव्हेंबरला मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडेल. त्यानंतर २८ किंवा २९ नोव्हेंबरला मी कोकणच्या दौऱ्यावर निघणार आहे. सुरुवातीला मी कोल्हापूरला जाणार आहे. त्याठिकाणी देवीचं दर्शन घेऊन पुढील कोकणच्या दौऱ्यावर जाणार आहे असं त्यांनी म्हटलं. मनसेच्या सलग्न संघटनांतील समस्या, अडचणी दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 

...मग राज ठाकरे संकुचित कसा?माझं पहिल्यापासून मत असेच होते की, पंतप्रधान हे देशाचे आहेत. सर्व राज्यांसाठी त्यांची भूमिका असायला हवी. महाराष्ट्रातून हा प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट नसते वाटले. परंतु जो प्रकल्प राज्याबाहेर जातोय तो गुजरातलाच जातोय याचे वाईट वाटते. राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल बोलतो मग तो संकुचित कसा? प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत. तिकडच्या स्थानिकांना रोजगार मिळायला हवा. प्रत्येक राज्यात उद्योग गेले तर देशाचा विकास होईल. आजही महाराष्ट्र उद्योगधंद्यामध्ये इतर राज्यांपेक्षा पुढे आहे. उद्योगपतींनाही महाराष्ट्र राज्य प्रथम पसंतीचं वाटतं असं राज ठाकरेंनी म्हटलं. 

मनसे-भाजपा-शिंदे गट युती होणार?दीपोत्सवाचं उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं त्यात गैर काय आहे? एखाद्या अभिनेत्याला बोलावलं तर मी चित्रपटात जाणार असं होते का? असं सांगत राज ठाकरेंनी पत्रकारांनी विचारलेल्या युतीच्या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी केली आहे त्याचसोबत सध्या जे राजकारण सुरू आहे ते खालच्या पातळीवरचं आहे. असे राजकारण महाराष्ट्रात याआधी पाहिले नव्हते. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे