शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

५०-५० कोटी देऊन आमदार, खासदार फोडले; राहुल गांधींचा दावा, ठाकरे गटातील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:48 IST

गांधी, नेहरू, पटेल वर्षभर जेलमध्ये राहिले परंतु त्यांनी इंग्रजांच्या पत्रावर सही केली नाही. सावरकरांनी केली असं राहुल गांधी म्हणाले.

अकोला -  माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यांना ५० कोटींची ऑफर होती असं म्हणाले. ते गेले नाहीत पण बाकीचे गेले. एकप्रकारे विरोधकांमध्ये साफसफाई होत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत १०-१५ कोटी घेऊन चाललेल चांगली बाब आहे. भारतात स्वच्छ नेत्यांची कमी नाही त्यामुळे ते आमच्यासोबत येतील असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा आम्ही विदर्भाच्या सीमेवर होतो. तेव्हा आमच्या लोकांनी म्हटलं की, तुम्हाला गीत ऐकवायचं आहे. महात्मा गांधी वर्धाला गेले का? असा मला प्रश्न होतो. भारतात इतर जागा होत्या मग इथे का? असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा गीत ऐकल्यानंतर मी त्या गेटच्या आतमध्येच जात मला सर्व समजलं. काँग्रेसची विचारधारा आहे ती विदर्भात आहे. जो नैसर्गिक काँग्रेसी आहेत ते विदर्भात आहेत असं त्यांनी सांगितले. 

सावरकर घाबरले होतेगांधी, नेहरू, पटेल वर्षभर जेलमध्ये राहिले परंतु त्यांनी इंग्रजांच्या पत्रावर सही केली नाही. सावरकरांनी केली. कारण त्यांच्या मनात भीती होती. जर भीती नसती तर त्यांनी सही केली नसती. ज्यावेळी सावरकरांनी सही केली तेव्हा भारतातील नेत्यांचा विश्वासघात केला. दोन विचारधारा आहे. मला तुमचा सेवक बनायचंय हे सावरकरांनी पत्रात इंग्रजांना लिहिलं होतं असं राहुल गांधींनी म्हटलं. 

देशासमोरच्या महत्त्वाच्या समस्या कोणत्या?युवकांना रोजगार मिळेल असा त्यांना विश्वास नाही. मला भेटलेल्या युवकांमध्ये एकही युवक भेटला नाही जो आत्मविश्वसाने मला नोकरी मिळेल असं म्हटलं नाही ही देशातील मोठी समस्या आहे. महागाई वाढतेय. तरुणांचे भविष्य बंद आहे. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना कुठलेही मदत नाही. शेतीमालाला भाव मिळत नाही. कर्ज माफ होत नाही. सरकारी हॉस्पिटल, शाळा-कॉलेज बंद करतायेत. गॅस सिलेंडर महाग झाला. पेट्रोल दर वाढले. सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे कुठे जातायेत याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे असंही राहुल गांधी म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना