शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

'अलमट्टी'च्या प्रश्नावर दिल्लीत ४ ऑगस्टला आमदार, खासदारांची बैठक; केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांसोबत करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:07 IST

हजारो हेक्टर क्षेत्र बाधित

सांगली : कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार आहे. उंचीविरोधात दोन्ही जिल्ह्यातून जोरदार विरोध होत असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीस सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार, आमदारांना बोलावले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बुधवारी दिले.सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढला आहे. याबाबत जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी मागील महिन्यात मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना उद्भवणारा धोका व त्याविरुद्ध जनतेची तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार, आमदारांनी केंद्राकडे भूमिका मांडावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार, आमदार यांना भेटीची वेळ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय जलशक्तीमंत्री पाटील यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रमशक्ती भवन, नवी दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधातील राज्यातील जनतेची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन लेखी पत्राद्वारे जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी केले आहे.

हजारो हेक्टर क्षेत्र बाधितया महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. अनेक गावांना स्थलांतर करावे लागते. परिणामी दीड ते दोन महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत आहे. कोट्यवधीचे नुकसान या महापुरामुळे होत आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो. त्यामुळे सांगलीसह कोल्हापूरला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे.