शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिंदे गटातील आमदार अजूनही नाराज; भर व्यासपीठावर बोलून दाखवली मनातील खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 16:11 IST

मागील अडीच वर्षात मी एखाद्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची सहीच पाहिली नाही असं सांगत शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला.

औरंगाबाद - राज्यात झालेल्या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. बहुमत गमावल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात सत्ता आणली. शिंदे मुख्यमंत्रिपदी तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. 

शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल या अपेक्षेने अनेक जण मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लावून होते. त्यात ९ ऑगस्टला राज्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यात नाव नसल्याने शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या विस्तारात स्थान मिळेल याच अपेक्षेवर शिरसाट आहे. परंतु शिरसाट यांच्या मनातील खंत त्यांनी पुन्हा एकदा भरव्यासपीठावर बोलून दाखवली. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, भाजपाचे मंत्री अतुल सावे यांच्या वडिलांसोबत मी काम केले. मात्र माझ्यानंतर अतुल सावे राजकारणात आले. राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले. आमच्याकडे पाहा ना. अतुल सावे मागून आले दोनदा मंत्री झाले. राजकारणात आजकाल सिनेरिटीचे काहीच राहिलेले नाही असं वाटू लागलंय असं सांगत त्यांनी व्यासपीठावरून नाराजी व्यक्त केली. आमदार शिरसाट यांच्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तसेच एकमेकांच्या विरोधात बोलून कधीही महत्त्व वाढत नाही. कामाची जोड त्यासाठी लागते. मी मतदारसंघात काय केले. शहरासाठी काय केले त्याला महत्त्व आहे. आज व्यासपीठावर शिवसेना-भाजपा दिसतेय परंतु निवडणुकीत सोबत राहा. एकजूट राहा. लढण्यासाठी इतर आहेत. आपल्यामध्ये फाटाफूट दिसतेय असा संभ्रम राहू नये. सावेंवर मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्याचा फायदा मतदारसंघाला झाला पाहिजे असंही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

दरम्यान, अतुल सावे आणि मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गेलो होतो. प्रत्येक निवेदनावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देतात. निधी तातडीने उपलब्ध करून दिला जातो. परंतु मागील अडीच वर्षात मी एखाद्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची सहीच पाहिली नाही असं सांगत शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. मतदारसंघातील कामं खोळंबली होती. त्याला गती देण्याचं काम या २ महिन्यात झाले असंही शिरसाट यांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरे