शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

आमदार सत्तेस्थापनेत व्यस्त तर मतदारसंघ वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 4:22 PM

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले असताना सुद्धा अजूनही सरकार स्थापन होऊ शकले नाहीत. सर्वच पक्षांनी नवनिर्वाचित आमदारांना सुरक्षित वेगवगेळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असताना सुद्धा, नवनिर्वाचित आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मतदारसंघात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. असे असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी याबाबतीत गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार करताना याआधी अनेकदा पाहायला मिळाले आहे.

राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता, शिवसनेने आपले आमदार गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवली आहे. तर काँग्रेसने आपली नवनिर्वाचित आमदार जयपूरला पाठवली आहे. त्यात भाजपच्या आमदारांसुद्धा मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा मुंबईतच ठाण मांडून बसले आहेत.

मतदारसंघातील समस्या घेऊन नागरिक लोकप्रतिनिधीकडे जात असतात. मात्र बहुतेक आमदार हे सद्या मतदारसंघात नसल्याने आपल्या अडचणी कुणाला सांगाव्यात असा प्रश्न लोकांना पडत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, पिक विमा अशा अनेक समस्या असताना लोकप्रतिनिधी मात्र सत्तास्थापनेत व्यस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.