शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 19:18 IST

मराठा समाजाचे जे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न झाला त्यात जरांगे पाटील यांचे आंदोलन आता भरकटतंय का असं म्हणण्यास वाव आहे असं मिटकरी म्हणाले.

मुंबई - मनोज जरांगे पाटील यांची पूर्वीची भूमिका आणि आत्ताची भूमिका बदलल्यासारखी वाटते. मराठा समाजाची आधीची मागणी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या अशी होती. त्यानंतर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी झाली. त्यानंतर ओबीसी नेत्यांनी काही आक्षेप घेतले. कुणबी नोंदी शोधण्याचं काम सरकार करतंय. परंतु जरांगे पाटील यांचे आंदोलन राजकीय दिशेने भरकटताना दिसतंय असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला. 

अमोल मिटकरी म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांच्या अलीकडच्या टीका पाहिल्या तर लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागतंय, भुजबळ तुला जागा दाखवू.भुजबळांचा एकेरी उल्लेख करू नये. ते वयाने ज्येष्ठ आहेत. त्यामुळे भुजबळांवर टीका करताना तोल ढासळू देऊ नका. तुम्ही आरक्षणाचे नेतृत्व करताय तर त्याबाबतीत विधाने करा. तुम्ही राजकीय विधाने करू नका. सरकार तुमचे प्रश्न सोडवायला समर्थ आहे. अधिवेशनात सरकार सकारात्मक मराठा आरक्षणावर निर्णय देणार आहे. पण ज्यावेळी भुजबळांनी त्यांच्या भाषणात प्रकाश सोळुंखे आणि अन्य लोकांची घरे जाळल्यानंतर जे बोलले त्यावर आतापर्यंत मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर जी टीका करतायेत ते नक्कीच अशोभनीय आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठा समाजाचे जे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न झाला त्यात जरांगे पाटील यांचे आंदोलन आता भरकटतंय का असं म्हणण्यास वाव आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी भाषा योग्य वापरावी अशी माझी त्यांना विनंती आहे असंही मिटकरींनी जरांगे पाटलांना सल्ला दिला. 

सुषमा अंधारे यांनीही केली होती टीका

मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढताहेत, असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं. परंतु मागच्या आठ-पंधरा दिवसांतल्या त्यांच्या भूमिका आहेत त्या पाहिल्या तर कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा फोकस हललेला दिसत आहे. आरक्षणावरचा फोकस हलून वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे हे शोभत नाही. एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुढे पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे तुम्ही आर्थिक मागाससलेले म्हणता दुसरीकडे शंभर शंभर जेसीबीतून फुलांची उधळण करून देता. एकीकडे आमच्याकडे काहीच नाही म्हणता, दुसरीकडे तुमच्या सभेसाठी दीडशे एकर मोसंबीची बाग तोडली जाते. एकीकडे तुम्ही म्हणता आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. मग दुसरीकडे ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय असंही म्हणता, ही विधानं चुकीची आहेत, असं स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण