शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

मुक्त विद्यापीठाकडून क्रांतिकारांचा अवमान, बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहास पुस्तकात चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:26 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक ४ मध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

अमरावती - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक ४ मध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार क्रांतिकारकांचा अवमान करणारा होय, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. याप्रकरणी दोषींना कठोर शासन व्हावे,

यासाठी निवेदन सादर केले आहे. मुक्त विद्यापीठाचे अमरावती विभागीय संचालक अंबादास मोहिते यांना सोमवारी अभाविपने दिलेल्या निवेदानातून क्रांतिकारकांचा अपमान करण्यामागे कुणाचा हात आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांची महत्त्वाची भूमिका होती. हे सर्वश्रूत असताना मुक्त विद्यापीठाने बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या पुस्तकात क्रांतिकारकांचा अपमान करून विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात चळवळीचा उगम, वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य, कुका आंदोलन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य, बंगाल व इतर प्रांतातील क्रांतिकार्य, भारताबाहेरील दहशतवादी चळवळ, क्रांतिकारकांच्या चळवळीचे अपयश या विषयाचे विवेचन आहे. मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम तयार करताना स्वतंत्र मंडळ असते. त्यामुळे ही गंभीर चूक अभ्यास मंडळाच्या लक्षात येऊ नये, हे आश्चर्य असल्याचे अभाविपने म्हटले आहे. पुस्तकातील चूक त्वरेने दुरूस्त करावी, दोषींवर कठोर शासन व्हावे, अन्यथा राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा अभाविपचे प्रदेश सहमंत्री ज्ञानेश्र्वर खुपसे, महानगर सहमंत्री प्रतीक जोशी, शिवानी मोरे, आनंद बुंदले, स्वाती कठाळे, धनश्री जोशी, रोहन देवलसे, अभिषेक काळे, दुर्गेश साठवणे आदींनी दिला आहे.         विद्यार्थ्यांना डिस्टंट मोडमध्ये पुस्तक वाटप होतात. मुक्त विद्यापीठाकडून बी.ए. द्वितीय इतिहासाच्या पुस्तकात देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ असा अनावधानाने उल्लेख झाला आहे. ही बाब नाशिक मुख्यालयात कळविली आहे. पुढच्या वर्षी यात नक्कीच सुधारणा होईल.     - अंबादास मोहिते,   संचालक, मुक्त विद्यापीठ अमरावती विभागीय केंद्र        क्रांतिकारकांच्या लढ्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, हे विसरता येणार नाही. असे असताना मुक्त विद्यापीठाने चक्क क्रांतिकारकांच्या लढ्यालाच दहशतवादी चळवळ, असे संबोधून समस्त क्रांतिकारकांचा अवमान केला आहे. यातील दोषींना कठोर शासन झाले पाहिजे.   - ज्ञानेश्वर खुपसे,      प्रदेश सहमंत्री, अभाविप

टॅग्स :Educationशिक्षणYashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठhistoryइतिहास