शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांची पाठराखण

By admin | Updated: April 1, 2015 02:16 IST

मुंबईतील मजासवाडी येथील सर्वोदयनगर गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या योजनेतील वादासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर

मुंबई : मुंबईतील मजासवाडी येथील सर्वोदयनगर गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या योजनेतील वादासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे सर्व संबंधितांची बैठक बोलावण्यास विद्या चव्हाण यांनी मंगळवारी विधान परिषदेत विरोध केला. तालिका सभापती प्रकाश बिनसाळे यांनीही मुख्यमंत्री अथवा गृहनिर्माण मंत्र्यांकडे बैठक घेण्याचे निर्देश दिले. मात्र गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी वायकर यांची पाठराखण करीत बैठक त्यांच्याकडेच होईल, असे ठाम प्रतिपादन केले.विद्या चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. यावर बोलताना चव्हाण यांनी वायकर यांनी आमदार असताना लिहिलेल्या एका पत्राचा संदर्भ देत ते सर्वोदयनगरातील रहिवाशांना न्याय देऊ शकणार नाहीत, असे मत व्यक्त केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चव्हाण यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. कॅबिनेट मंत्र्यांकडेच बैठक झाली पाहिजे असा आग्रह धरणे योग्य नाही, असे कदम म्हणाले. तालिका सभापती प्रकाश बिनसाळे म्हणाले की, हा प्रश्न वायकर यांच्या मतदारसंघातील असल्याने कॅबिनेट मंत्र्यांकडेच बैठक होणे चांगले होईल. राज्यमंत्री वायकर हे त्या बैठकीला हजर राहतील. त्यांच्यावर आरोप करण्याची संधी कुणालाही मिळू नये, याकरिता आपण हे निर्देश देत आहोत. मात्र गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी बैठक राज्यमंत्री वायकर यांच्याकडेच होईल आणि जर त्या बैठकीत अन्यायकारक निर्णय झाला असे वाटले तर तुम्ही दाद मागू शकता. परंतु राज्यव्यवस्थेवर असा अविश्वास दाखवू नका, असेही महेता म्हणाले.तत्पूर्वी विद्या चव्हाण म्हणाल्या की, ९३० चौ.फुटांचे घर देतो सांगून सर्वोदयनगरातील रहिवाशांची बिल्डरने फसवणूक केली आहे. शिवाय हे म्हाडाचे रहिवासी असताना त्यांना झोपडपट्टीवासीय असल्याचे भासवले जात असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यमंत्री वायकर म्हणाले की, २००९ मध्ये एकूण २२ सोसायट्यांपैकी १९ सोसायट्यांनी जे. के. इन्फ्रास्ट्रक्चर्स या बिल्डरला संमतीपत्रे दिली. ३ सोसायट्यांमधील रहिवासी योजनेत सहभागी झाले नाहीत. त्यानंतर ५७९ रहिवाशांपैकी १०३ रहिवाशांनी बिल्डरशी असहकार केला. एकूण ५३४ लोकांनी संमतीपत्रे दिली असून, ४२४ लोकांनी घरे रिकामी केली आहेत तर ५५५ लोकांनी अजून घरे सोडलेली नाहीत. सध्या तेथे चार मजली इमारतीचे काम सुरू आहे. सर्वोदयनगरातील रहिवाशांच्या ‘सर्वोदयनगर बचाव समिती’शी विधिमंडळ अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन चर्चा करण्याची मागणी भाई जगताप यांनी केली आणि ती वायकर यांनी मान्य केली. (विशेष प्रतिनिधी)