शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांनी बोलताना संयम पाळावा, देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली राजधर्माची आठवण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ साेहळ्यात वाजपेयींनी दिलेल्या मंत्राची करून दिली आठवण; राजभवनमध्ये रंगला दिमाखदार कार्यक्रम; ‘मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन’ पुरस्काराने मुख्यमंत्र्यांचा गौरव; अनेक मान्यवरांची मांदियाळी

मुंबई : मंत्र्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे, अशा कानपिचक्या देताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी राजधर्म पाळण्याच्या दिलेल्या मंत्राची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना करून दिली. त्याचबरोबर आपण मुंबईत खूश आहोत, असे सांगून दिल्लीत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ७५ वर्षांची वयाची सीमा स्वतः नरेंद्र मोदींजींनी ठरवली असली, तरी ती आम्हाला मान्य नाही, २०२९ साली नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, अशी आमची इच्छा असल्याचेही फडणवीस म्हणाले.

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५’च्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. 

सरकारमधील काही जबाबदार व्यक्ती काही विशिष्ट समाजाविरोधात टोकाची भाषा वापरतात, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, याबाबत आपली भावना काय आहे ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली.

 जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. मंत्री म्हणून आपली भूमिका आहे, ज्याचा उल्लेख कधीतरी अटलबिहारी वाजपेयींनी केला होता की, मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपले विचार, आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाने कोणाही सोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे, आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, तेव्हा मी त्यांच्याशी संवाद करतो आणि सांगतो आता तुम्ही मंत्री आहात त्यामुळे तुम्ही संयम बाळगूनच बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाहीनरेंद्र मोदी लवकरच ७५ वर्षांचे होतील, ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत अशी आपल्या पक्षाची इच्छा असेल यात शंका नाही. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, यात तुम्ही आपल्याला कुठे पाहता? असे विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की, ज्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फीट आहे. आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात दिलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन, मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही, मी मुंबईत अतिशय खूश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचे वातावरण उत्तम आहे आणि मुंबईत तुमच्यासारखे मित्र आहेत, त्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी