शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

मंत्र्यांनी बोलताना संयम पाळावा, देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली राजधर्माची आठवण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ साेहळ्यात वाजपेयींनी दिलेल्या मंत्राची करून दिली आठवण; राजभवनमध्ये रंगला दिमाखदार कार्यक्रम; ‘मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन’ पुरस्काराने मुख्यमंत्र्यांचा गौरव; अनेक मान्यवरांची मांदियाळी

मुंबई : मंत्र्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे, अशा कानपिचक्या देताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी राजधर्म पाळण्याच्या दिलेल्या मंत्राची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना करून दिली. त्याचबरोबर आपण मुंबईत खूश आहोत, असे सांगून दिल्लीत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ७५ वर्षांची वयाची सीमा स्वतः नरेंद्र मोदींजींनी ठरवली असली, तरी ती आम्हाला मान्य नाही, २०२९ साली नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, अशी आमची इच्छा असल्याचेही फडणवीस म्हणाले.

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५’च्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. 

सरकारमधील काही जबाबदार व्यक्ती काही विशिष्ट समाजाविरोधात टोकाची भाषा वापरतात, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, याबाबत आपली भावना काय आहे ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली.

 जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. मंत्री म्हणून आपली भूमिका आहे, ज्याचा उल्लेख कधीतरी अटलबिहारी वाजपेयींनी केला होता की, मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपले विचार, आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाने कोणाही सोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे, आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, तेव्हा मी त्यांच्याशी संवाद करतो आणि सांगतो आता तुम्ही मंत्री आहात त्यामुळे तुम्ही संयम बाळगूनच बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाहीनरेंद्र मोदी लवकरच ७५ वर्षांचे होतील, ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत अशी आपल्या पक्षाची इच्छा असेल यात शंका नाही. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, यात तुम्ही आपल्याला कुठे पाहता? असे विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की, ज्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फीट आहे. आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात दिलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन, मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही, मी मुंबईत अतिशय खूश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचे वातावरण उत्तम आहे आणि मुंबईत तुमच्यासारखे मित्र आहेत, त्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी