शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दहीहंडीचा थरार नेणार जागतिक पातळीवर, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:12 IST

हिंदुंचे सण साजरे करत असताना त्याला विशिष्ट दर्जा देऊन जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत असेल, तर कोणाला पोटशूळ उठण्याची गरज नाही.

मुंबई :

हिंदुंचे सण साजरे करत असताना त्याला विशिष्ट दर्जा देऊन जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत असेल, तर कोणाला पोटशूळ उठण्याची गरज नाही. ही न्याय देण्याची भूमिका आहे, या शब्दांत गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचे शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी समर्थन केले आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देऊन जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे ते म्हणाले.

दहीहंडीचा साहसी खेळात समावेश व्हावा, यासाठी २० वर्षांपासून मागणी होत आहे. या काळात इतकी सरकारे आली, पण दहीहंडीला खेळाचा दर्जा द्यावा, यात सहभागी होणाऱ्या मुलांना नोकरी द्यावी, असे कुणालाही वाटले नाही. सरकार बदलले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले हे अजूनही काही जणांना रुचले नसल्याने ते असे आरोप करत आहेत अशी टीका सामंत यांनी या निर्णयाचा विरोध करणाऱ्यांवर केली.

ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्नया निर्णयामुळे हजारो गोविंदांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या निर्णयाबद्दल गैरसमज पसरवण्यापेक्षा हिंदू धर्माचा सण जागतिक पातळीवर जावा, ऑलिम्पिकमध्ये जावा म्हणून या स्पर्धा ३६५ दिवस चालल्या पाहिजेत यासाठी सगळ्यांनी मिळून नियोजन केले पाहिजे, असे सांगत गैरसमज पसरवण्यापेक्षा विरोधी पक्षांनीही याचे स्वागत केले पाहिजे, असे आवाहन सामंत यांनी केले.

क्रीडा मंत्रालयामार्फत लवकरच नियमावलीगोविंदांना आरक्षण देण्याबाबत क्रीडा खात्याचे अधिकारी लवकरच नियमावली बनवतील. वयोगट काय असला पाहिजे, शिक्षण काय असले पाहिजे, तालुका स्तरावरच्या, जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा आदींबाबत नियमावली तयार केली जाईल. त्यातून टॅलेंट निवडले जाईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.कोणत्याही क्रीडा प्रकारावर अन्याय होणार नाही

गोविंदांना शासकीय नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. ज्या खेळांसाठी पाच टक्के क्रीडा विभागाचे आरक्षण आहे, त्यातील सुरुवातीच्या क्रीडा प्रकारावरही कुठेही अन्याय होणार नाही. पूर्वीचे जे साहसी खेळ आहेत, त्याबाबतच्या निर्णयात स्वल्पविराम टाकून या खेळाचा समावेश होणार आहे. पूर्वीच्या खेळांची मान्यता रद्द होणार आहे असे नाही किंवा त्यांना पाच टक्के आरक्षण मिळणार नाही असेही नाही. पूर्वीच्या साहसी खेळातील खेळाडूंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDahi Handiदहीहंडी