शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

दहीहंडीचा थरार नेणार जागतिक पातळीवर, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:12 IST

हिंदुंचे सण साजरे करत असताना त्याला विशिष्ट दर्जा देऊन जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत असेल, तर कोणाला पोटशूळ उठण्याची गरज नाही.

मुंबई :

हिंदुंचे सण साजरे करत असताना त्याला विशिष्ट दर्जा देऊन जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत असेल, तर कोणाला पोटशूळ उठण्याची गरज नाही. ही न्याय देण्याची भूमिका आहे, या शब्दांत गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचे शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी समर्थन केले आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देऊन जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे ते म्हणाले.

दहीहंडीचा साहसी खेळात समावेश व्हावा, यासाठी २० वर्षांपासून मागणी होत आहे. या काळात इतकी सरकारे आली, पण दहीहंडीला खेळाचा दर्जा द्यावा, यात सहभागी होणाऱ्या मुलांना नोकरी द्यावी, असे कुणालाही वाटले नाही. सरकार बदलले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले हे अजूनही काही जणांना रुचले नसल्याने ते असे आरोप करत आहेत अशी टीका सामंत यांनी या निर्णयाचा विरोध करणाऱ्यांवर केली.

ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्नया निर्णयामुळे हजारो गोविंदांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या निर्णयाबद्दल गैरसमज पसरवण्यापेक्षा हिंदू धर्माचा सण जागतिक पातळीवर जावा, ऑलिम्पिकमध्ये जावा म्हणून या स्पर्धा ३६५ दिवस चालल्या पाहिजेत यासाठी सगळ्यांनी मिळून नियोजन केले पाहिजे, असे सांगत गैरसमज पसरवण्यापेक्षा विरोधी पक्षांनीही याचे स्वागत केले पाहिजे, असे आवाहन सामंत यांनी केले.

क्रीडा मंत्रालयामार्फत लवकरच नियमावलीगोविंदांना आरक्षण देण्याबाबत क्रीडा खात्याचे अधिकारी लवकरच नियमावली बनवतील. वयोगट काय असला पाहिजे, शिक्षण काय असले पाहिजे, तालुका स्तरावरच्या, जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा आदींबाबत नियमावली तयार केली जाईल. त्यातून टॅलेंट निवडले जाईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.कोणत्याही क्रीडा प्रकारावर अन्याय होणार नाही

गोविंदांना शासकीय नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. ज्या खेळांसाठी पाच टक्के क्रीडा विभागाचे आरक्षण आहे, त्यातील सुरुवातीच्या क्रीडा प्रकारावरही कुठेही अन्याय होणार नाही. पूर्वीचे जे साहसी खेळ आहेत, त्याबाबतच्या निर्णयात स्वल्पविराम टाकून या खेळाचा समावेश होणार आहे. पूर्वीच्या खेळांची मान्यता रद्द होणार आहे असे नाही किंवा त्यांना पाच टक्के आरक्षण मिळणार नाही असेही नाही. पूर्वीच्या साहसी खेळातील खेळाडूंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतDahi Handiदहीहंडी