शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य राज्यमंत्र्यांचा हट्ट जीवनदायी योजनेच्या मुळावर, बंदी घातलेल्या हॉस्पिटलसाठी आग्रह

By अतुल कुलकर्णी | Updated: September 15, 2020 06:46 IST

महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन योजना जीवनदायी अंतर्गत राबवल्या जातात. त्यासाठी जे खासगी हॉस्पिटल इम्पॅनल केले जाते त्यांना १४ हजारांपासून दीड लाखापर्यंत रक्कम प्रतिरुग्ण, आजारानुसार मिळते.

- अतुल कुलकर्णीमुंबई : जीवनदायी योजनेसाठी स्वत:च्या मतदारसंघातील बंदी घातलेल्या खासगी हॉस्पिटलला पुन्हा योजनेत घेण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे आरोग्य राज्यमंत्र्यांनी या योजनेसाठी आता मंत्री आणि राज्यमंत्री गटाची त्रिस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. मात्र असे केले तर मंत्री परस्पर हॉस्पिटल्सना योजनेत घ्यायचे की नाही हे ठरवतील व त्याचा योजनेवर परिणाम होईल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन योजना जीवनदायी अंतर्गत राबवल्या जातात. त्यासाठी जे खासगी हॉस्पिटल इम्पॅनल केले जाते त्यांना १४ हजारांपासून दीड लाखापर्यंत रक्कम प्रतिरुग्ण, आजारानुसार मिळते. त्यातून गोरगरीब रुग्णांवर त्या हॉस्पिटलनी उपचार करणे अपेक्षित आहे. यासाठी रुग्णांकडून एक रुपयादेखील घेता येत नाही. जीवनदायी योजनेत अनेक राज्यांत १ हजार खासगी हॉस्पिटल्सना इम्पॅनलमेंट केले आहे. मात्र रुग्णांकडून पैसे मागणे, चुकीची माहिती देणे, रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणे या कारणांमुळे ३२८ हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे.

यापैकी एक हॉस्पिटल राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघातले आहे. त्याला पुन्हा इम्पॅनल करावे यासाठी त्यांचा आग्रह होता, पण ते होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी इम्पॅनलचे अधिकारच आयुक्तालयाकडून काढण्यासाठी पत्र लिहिले आहे. असे झाले तर मंत्री स्तरावर खासगी हॉस्पिटलला मान्यता दिली जाईल. मंत्र्यांकडून काम करून घेतले की अधिकाºयांचे न ऐकण्याची मनोवृत्ती वाढेल.

आपापल्या मतदारसंघातील खासगी हॉस्पिटलचा वापर राजकारणासाठी केला जाईल. ते होऊ द्यायचे नसेल तर ही यंत्रणा आणि निर्णय आयुक्तांच्या स्तरावरच असले पाहिजेत, असे मत अनेक ज्येष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केले. पुण्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी या आयुक्तालयाची आखणी मजबूत केली होती, त्यामुळे त्याला छेद देण्याचे काम झाले तर या योजनेतही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू होतील, अशी भीती अधिकाºयांना वाटत आहे.आपण अशी मागणी केली नाही - राज्यमंत्रीआपण अशी कोणतीही मागणी केली नाही. असे करता येऊ शकते का याची फक्त आपण विचारणा केली आहे. सगळे अधिकार राज्यमंत्र्यांना असावेत, असे आपले मत नाही. मंत्रालयातून हे निर्णय झाले तर गैरप्रकार होणार नाहीत असे आपल्याला वाटते, असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले. (मात्र ‘लोकमत’कडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राची प्रत आहे.) या निर्णयामुळे काय होईल असे विचारले असता, मी माहिती घेऊन आपल्याशी बोलेन, असे उत्तर त्यांनी दिले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस