शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

धनुष्यबाण चिन्ह मिळालं नाही तर...; मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितला पुढचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 14:39 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातात तिथे दुतर्फा लोक स्वागत करतात. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हणतात त्यामुळे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत असं शंभुराज देसाई म्हणाले.

मुंबई - धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल असा आमचा विश्वास आहे. त्याचं कारण बहुमतातील शिवसेना ही आमच्याकडे आहे. आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यातील सर्व लोकप्रतिनिधी जे लोकांमधून निवडून आलेत. त्यांचे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे. परंतु शेवटी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. जो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तो मान्य करत आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जावू असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. 

शंभुराज देसाई म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल मात्र समजा, न्यायालयाने वेगळा निर्णय दिला तर आमची सर्वबाजूने तयारी सुरू आहे. लोकांना ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन कोण पुढे चालले आहे. हे २ महिन्यात लोकांना पटलेले आहे. शेकडो लोक आम्ही जेव्हा मतदारसंघात जातो तेव्हा स्वागताला येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातात तिथे दुतर्फा लोक स्वागत करतात. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हणतात त्यामुळे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असतील परंतु विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाताना नवीन चिन्ह लोकांपर्यंत रुजवण्यास वेळ लागेल. परंतु आम्ही ते लोकांपर्यंत घेऊन जावू. कष्ट करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही शाखाप्रमुख, बूथप्रमुखांपर्यंत शिवसेना पोहचवली आहे. त्यामुळे आम्हाला फारसी अडचण येणार नाही असा विश्वासही शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. 

मनसे युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचादरम्यान, मनसेसोबत युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आम्ही जे ४० आमदार शिंदेसोबत आहोत त्यांनी एक ओळीचा ठराव पहिल्या दिवशी केला आहे. जो निर्णय घ्यायचा आहे त्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना दिले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गेले तर आम्हालाही आनंद होईल. हिंदुत्ववादी विचारांचे विभाजन होऊ नये हे आमचेही मत आहे. २०१९ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही मते मागितली. परंतु सरकार बनवताना लोकांच्या मतांचा अनादर करत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो. भाजपाला बाजूला ठेवले. लोकांना आजही हिंदुत्ववादी विचारांचे विभाजन नकोय. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जे नेते ठरवतील ते मान्य करू असं मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितले. ते टीव्ही ९ च्या मुलाखतीत बोलत होते. 

दसरा मेळावा शिवतीर्थावर होईलदसरा मेळावा हा ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आम्ही खरे वारसदार आहोत. तो आमचाच होणार. वर्षावरील गणरायाच्या दर्शनानंतर आमदारांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची आग्रही मागणी केली. आमचाच दसरा मेळावा शिवतीर्थावर होईल असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र नंबर वन करण्यासाठी गणरायाला साकडं  २ वर्षाच्या कोविडनंतर राज्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी २ वर्षात महाराष्ट्र राज्य देशात नंबर वन करण्याची ताकद, शक्ती आणि आशीर्वाद बाप्पानं आम्हाला द्यावा असं साकडं मी गणराया चरणी केली आहे असं शंभुराज देसाईंनी सांगितले.  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसे