शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"राजन साळवी नाही म्हणत होते पण आले ना"; वैभव नाईकांबाबत विचारताच संजय शिरसाटांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:47 IST

वैभव नाईक यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

Sanjay Shirsat: ठाकरे गटाचे राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हे दोनच शिलेदार ठाकरेंकडे राहिले आहेत. अशातच वैभव नाईक हेदेखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजन साळवी हे नाही म्हणता म्हणता शिवसेनेत आले असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर आणखी नेते पक्ष सोडणार असल्याचे म्हटलं जात आहे.राजन साळवी, रत्नागिरीचे माजी आमदार सुभाष बने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता वैभव नाईक हे देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पत्रकरांनी विचारले असता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.

"राजन साळवी सांगत होते की मी जाणार नाही. पण ते आले ना. वैभव नाईकही तेच सांगत आहेत. म्हणजे तुम्ही याचा अर्थ समजून घ्या हे जे काही येणारे आहेत ते सगळे नाही म्हणून येणारे आहेत. त्यामुळे भास्कर जाधव, वैभव नाईक यांच्यासह अनेक खासदार, आमदार हे केव्हा येणार आहेत याची तारीख तुम्हाला एकनाथ शिंदे सांगू शकतील. म्हणून वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला पाहिजे," असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटRajan Salviराजन साळवीVaibhav Naikवैभव नाईक Uddhav Thackerayउद्धव ठाकरे