शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 19:46 IST

साहित्य संमेलन तयारी आढावा बैठक घेण्यात येऊन बोधचिन्हाचे प्रकाशन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

उदगीर (जि. लातूर) : उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाचे संयोजक बसवराज पाटील-नागराळकर यांनी केली. या संमेलनाच्या प्रमुख मार्गदर्शकपदी पालकमंत्री अमित देशमुख राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साहित्य संमेलन तयारी आढावा बैठक घेण्यात येऊन बोधचिन्हाचे प्रकाशन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष व संयोजक बसवराज पाटील-नागराळकर होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, संस्था सचिव मनोहर पटवारी, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, मनोहर पटवारी, सभापती शिवाजीराव मुळे, तहसीलदार रामेश्वर गोरे, रमेश अंबरखाने, दिनेश सास्तुरकर, संस्था उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्याधिकारी भारत राठोड, नाथराव बंडे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, चंद्रकांत पाटील-कौळखेडकर, मल्लिकार्जुन मानकरी, महादेव नौबदे, जितेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक रामचंद्र तिरुके यांनी केले. या कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार केलेले बार्शी येथील कलाकार किरण कुलकर्णी व जयंता पवार यांचा राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वागताध्यक्ष पदाचा सन्मान मला दिला गेल्याचा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण असल्याचे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले. या साहित्य संमेलनाचे प्रमुख सल्लागार पालकमंत्री अमित देशमुख राहणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी जाहीर केले. सूत्रसंचालन प्रा. राम साबदे यांनी केले. आभार प्रा. हमीद अश्रफ यांनी मानले.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ