शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

"मोदी म्हणाले होते, 'रुपया पडला की इज्जत जाते', आज रुपया इतका पडलाय की भारताची चड्डीच काढलीय"- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:51 IST

शेजारील देश जात,वर्चस्ववाद, समुह व्यवस्था, धर्मव्यवस्थेमुळे काय वाटोळे झालंय ते बघतोय. सगळे जळून खाक झालेत.

मुंबई – आम्ही पेट्रोल विचारात घेत नाही, डिझेल विचारत नाही. गॅसचे दर विचारात घेत नाही. पडलेल्या रुपयाची किंमत विचारात घेत नाही. देश का रुपया जब गिरता है तब देश की इज्जत उतर जाती है असं मोदी म्हणाले होते. परंतु आज भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपया इतका खाली गेलाय की भारताची चड्डी काढलीय अशा शब्दात मी सांगेन असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपल्याला भोंग्याबद्दल बोलायचं असते, जाती-धर्मावर बोलायचं असते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका यासारखे देश जात,वर्चस्ववाद, समुह व्यवस्था, धर्मव्यवस्थेमुळे काय वाटोळे झालंय ते बघतोय. सगळे जळून खाक झालेत. त्याठिकाणी खायचे वांदे झाले आहेत. आपण त्यातून काही शिकणार असू तर ठीक असं सांगत आव्हाडांनी भाजपाला टोला लगावला.

तसेच जो दुसऱ्यांसाठी खड्डे बनवायला जातो तो स्वतःच खड्ड्यात कसा जातो याचं आधुनिक काळातलं उदाहरण म्हणजे हा भोंगापती. हिंदू मुसलमान वाद करण्यासाठी तुम्ही बोंबा उकरून काढला परंतु सगळ्यात जास्त नुकसान हे हिंदूंचाच झालं. मी सुद्धा हिंदू आहे पण मला तुमचं हिंदुत्व मान्य नाही जे इतरांना तुच्छ लेखतात. अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर टीका केली घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

नाना पटोलेंना प्रगल्भता नाही - आव्हाड

महाराष्ट्र सरकारमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत. एकाच घरामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ यांची भांडणे असतातच परंतु बाहेर जाऊन बोलणं यात तुमची प्रगल्भता दिसते. ही प्रगल्भता नाना पटोलेंमध्ये नाही इनम्यॅच्युरिटी आहे अशा शब्दात आव्हाडांनी नाना पटोलेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

केतकीनं जी बाबासाहेबांवर पोस्ट लिहिलीय ती मी पोस्ट करणार

अभिनेत्री केतकी चितळे हिने पवारांबद्दल लिहिलं त्यामुळे सदाभाऊ ना कदाचित राग येत नसेल परंतु तिने बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेले आहे जर तुम्ही तिला समर्थन करत असाल तर हिंमत असेल तर शिवाजी पार्कात एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी तिने लिहिलेली बाबासाहेबांबद्दल ची भीम बांधवांबद्दल लिहिलेली पोस्ट टाकणार आहे ती स्त्री आहे म्हणून तिला सोडून देणं चालणार नाही. हा बौद्धिक प्रामाण्यवाद आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदी