शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

"मोदी म्हणाले होते, 'रुपया पडला की इज्जत जाते', आज रुपया इतका पडलाय की भारताची चड्डीच काढलीय"- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:51 IST

शेजारील देश जात,वर्चस्ववाद, समुह व्यवस्था, धर्मव्यवस्थेमुळे काय वाटोळे झालंय ते बघतोय. सगळे जळून खाक झालेत.

मुंबई – आम्ही पेट्रोल विचारात घेत नाही, डिझेल विचारत नाही. गॅसचे दर विचारात घेत नाही. पडलेल्या रुपयाची किंमत विचारात घेत नाही. देश का रुपया जब गिरता है तब देश की इज्जत उतर जाती है असं मोदी म्हणाले होते. परंतु आज भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपया इतका खाली गेलाय की भारताची चड्डी काढलीय अशा शब्दात मी सांगेन असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपल्याला भोंग्याबद्दल बोलायचं असते, जाती-धर्मावर बोलायचं असते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका यासारखे देश जात,वर्चस्ववाद, समुह व्यवस्था, धर्मव्यवस्थेमुळे काय वाटोळे झालंय ते बघतोय. सगळे जळून खाक झालेत. त्याठिकाणी खायचे वांदे झाले आहेत. आपण त्यातून काही शिकणार असू तर ठीक असं सांगत आव्हाडांनी भाजपाला टोला लगावला.

तसेच जो दुसऱ्यांसाठी खड्डे बनवायला जातो तो स्वतःच खड्ड्यात कसा जातो याचं आधुनिक काळातलं उदाहरण म्हणजे हा भोंगापती. हिंदू मुसलमान वाद करण्यासाठी तुम्ही बोंबा उकरून काढला परंतु सगळ्यात जास्त नुकसान हे हिंदूंचाच झालं. मी सुद्धा हिंदू आहे पण मला तुमचं हिंदुत्व मान्य नाही जे इतरांना तुच्छ लेखतात. अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर टीका केली घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

नाना पटोलेंना प्रगल्भता नाही - आव्हाड

महाराष्ट्र सरकारमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत. एकाच घरामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ यांची भांडणे असतातच परंतु बाहेर जाऊन बोलणं यात तुमची प्रगल्भता दिसते. ही प्रगल्भता नाना पटोलेंमध्ये नाही इनम्यॅच्युरिटी आहे अशा शब्दात आव्हाडांनी नाना पटोलेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

केतकीनं जी बाबासाहेबांवर पोस्ट लिहिलीय ती मी पोस्ट करणार

अभिनेत्री केतकी चितळे हिने पवारांबद्दल लिहिलं त्यामुळे सदाभाऊ ना कदाचित राग येत नसेल परंतु तिने बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेले आहे जर तुम्ही तिला समर्थन करत असाल तर हिंमत असेल तर शिवाजी पार्कात एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी तिने लिहिलेली बाबासाहेबांबद्दल ची भीम बांधवांबद्दल लिहिलेली पोस्ट टाकणार आहे ती स्त्री आहे म्हणून तिला सोडून देणं चालणार नाही. हा बौद्धिक प्रामाण्यवाद आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदी