शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

"मोदी म्हणाले होते, 'रुपया पडला की इज्जत जाते', आज रुपया इतका पडलाय की भारताची चड्डीच काढलीय"- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:51 IST

शेजारील देश जात,वर्चस्ववाद, समुह व्यवस्था, धर्मव्यवस्थेमुळे काय वाटोळे झालंय ते बघतोय. सगळे जळून खाक झालेत.

मुंबई – आम्ही पेट्रोल विचारात घेत नाही, डिझेल विचारत नाही. गॅसचे दर विचारात घेत नाही. पडलेल्या रुपयाची किंमत विचारात घेत नाही. देश का रुपया जब गिरता है तब देश की इज्जत उतर जाती है असं मोदी म्हणाले होते. परंतु आज भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपया इतका खाली गेलाय की भारताची चड्डी काढलीय अशा शब्दात मी सांगेन असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपल्याला भोंग्याबद्दल बोलायचं असते, जाती-धर्मावर बोलायचं असते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका यासारखे देश जात,वर्चस्ववाद, समुह व्यवस्था, धर्मव्यवस्थेमुळे काय वाटोळे झालंय ते बघतोय. सगळे जळून खाक झालेत. त्याठिकाणी खायचे वांदे झाले आहेत. आपण त्यातून काही शिकणार असू तर ठीक असं सांगत आव्हाडांनी भाजपाला टोला लगावला.

तसेच जो दुसऱ्यांसाठी खड्डे बनवायला जातो तो स्वतःच खड्ड्यात कसा जातो याचं आधुनिक काळातलं उदाहरण म्हणजे हा भोंगापती. हिंदू मुसलमान वाद करण्यासाठी तुम्ही बोंबा उकरून काढला परंतु सगळ्यात जास्त नुकसान हे हिंदूंचाच झालं. मी सुद्धा हिंदू आहे पण मला तुमचं हिंदुत्व मान्य नाही जे इतरांना तुच्छ लेखतात. अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर टीका केली घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

नाना पटोलेंना प्रगल्भता नाही - आव्हाड

महाराष्ट्र सरकारमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत. एकाच घरामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ यांची भांडणे असतातच परंतु बाहेर जाऊन बोलणं यात तुमची प्रगल्भता दिसते. ही प्रगल्भता नाना पटोलेंमध्ये नाही इनम्यॅच्युरिटी आहे अशा शब्दात आव्हाडांनी नाना पटोलेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

केतकीनं जी बाबासाहेबांवर पोस्ट लिहिलीय ती मी पोस्ट करणार

अभिनेत्री केतकी चितळे हिने पवारांबद्दल लिहिलं त्यामुळे सदाभाऊ ना कदाचित राग येत नसेल परंतु तिने बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेले आहे जर तुम्ही तिला समर्थन करत असाल तर हिंमत असेल तर शिवाजी पार्कात एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी तिने लिहिलेली बाबासाहेबांबद्दल ची भीम बांधवांबद्दल लिहिलेली पोस्ट टाकणार आहे ती स्त्री आहे म्हणून तिला सोडून देणं चालणार नाही. हा बौद्धिक प्रामाण्यवाद आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदी