शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आमचं कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग...; चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटातील नेत्याने दिले प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:40 IST

दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.

मुंबई: दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. या दाव्याला आज शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. 

आम्ही अशा पद्धतीचे कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते. हा आमचा उत्स्फुर्त उठाव होता. आमचा हा उठाव काही तत्वांसाठी होता. आमचं या संदर्भात अगोदर कोणतही प्लॅनिंग नव्हते, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.  

आपापसांतील भांडाभांड बंद करा; चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले

भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल काल पुण्यात पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेतील काही किस्से सांगितले. 

"आपापसांतील भांडाभांड बंद करा"

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शंभर नगरसेवक निवडून आले तरच, भाजपने पुणे महापालिका जिंकली असे मी मानेन. ९९ नगरसेवक आल्यावर महापौर आपला होईल; पण भाजपने महापालिका जिंकली असे मी कधीच म्हणणार नाही. त्यामुळे आपापसांतील भांडाभांड बंद करा, अशा स्पष्ट शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले.

चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शहर भाजपच्या वतीने गुरुवारी पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी अशा प्रकारच्या समारंभात वेळही जातो व पैसाही खर्च होतो, या मताचा मी आहे, असे सांगितले. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सत्कार कार्यक्रम संघटनात्मक बांधणीसाठी बळ देईल; त्यासाठीच मी या कार्यक्रमाचा स्वीकार केला असेही त्यांनी नमूद केले.

पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांनी मोठा त्रास दिला. तरीही भाजपचे कार्यकर्ते टिकून राहिले. फडणवीस सरकारचे निर्णय रद्द करणे व खुन्नस काढणे एवढेच काम त्यांनी केले. परंतु, या काळात हे सरकार कसे जाईल असे आमचे नियोजन चालूच होते व शेवटी ते खरे झालेच. आता पुढील काळात खूप मोठी आव्हाने पेलावी लागणार असून, शहरातील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, जायका प्रकल्प पूर्ण करणे, रिंग रोड, मेट्रो, आदी कामांसाठी अठरा-वीस तास कामाची तयारी सर्वांनीच ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDipak Kesarkarदीपक केसरकर