शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

उद्धव ठाकरेंबद्दल आदर, मात्र आता गौप्यस्फोट करावाच लागेल; दीपक केसरकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 16:35 IST

ज्यांचे अस्तित्व खोटे बोलणे, त्यावर राजकीय पोळी भाजून घेणे यावर आहे त्यांनी कुठेतरी थांबले पाहिजे असं केसरकरांनी ठाकरेंबद्दल म्हटलं आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेवर कायम शिवसेना-भाजपा युतीची सत्ता राहिली होती. गेल्यावेळी भाजपाने बिनशर्त पाठिंबा शिवसेनेला दिला होता. युती तुटण्यामागे मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला हे खोटे आहे. असं असते तर निर्विवाद सत्ता शिवसेनेला का दिली याचा विचार जनतेने करायला हवा. प्रत्येकाचा मान राखला पाहिजे. उद्धव ठाकरेंचा मान सर्वाधिक राखतो. पण आदित्य ठाकरे ज्याप्रकारे विधाने करतात त्याला उत्तर यायलाच लागतील. त्यामुळे गौप्यस्फोट करण्याची पाळी आठवडाभरात माझ्यावर येईल आणि गौप्यस्फोट यासाठी करावा लागेल ज्याने वास्तव जनतेसमोर येईल असा इशारा मंत्री दीपक केसरकरांनी दिला आहे. 

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, जे खोटे बोलले जाते त्यामुळे आमदार दुखावले जातात. राजकीय पक्ष विचारधारेवर चालतात. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा आणि युती करून सरकार स्थापन करा ही आम्ही जी मागणी केली त्यात चुकीचं काय नव्हते. त्यामुळे तुम्ही जे खोटे आरोप करताय त्याचे उत्तर द्यावेच लागेल अन्यथा यामुळे जनतेच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण होतायेत असं त्यांनी सांगितले. 

...तर मोठे उद्योगपती मुख्यमंत्री, पंतप्रधान बनले असतेउद्धव ठाकरेंना एकच माहिती आहे विकत घेणे, विकत घेतले जात असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान हे मोठे उद्योगपती बनले असते. बाळासाहेबांनी प्रेमाने कार्यकर्ते जिंकले. बाळासाहेबांसाठी जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी राज्यात निर्माण केली त्याला शिवसैनिक म्हणतात. ज्यांना ही फळी सांभाळता आली नाही त्यांनी हे विधान करणे चुकीचे आहे. कार्यकर्त्यांना सोडा, मंत्र्यांना, आमदारांनाही भेटण्याची दखल घेतली नाही. त्यांनी हे बोलू नये. स्वत:च्या पदासाठी युती तोडली. तुम्ही दुखावलात म्हणून सगळ्यांनी साथ दिली. परंतु त्याचा परिणाम मूळ पक्षावर झाला. पाचव्या क्रमांकावर शिवसेना फेकली गेली. तरीही तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरफटत जात आहात असा आरोप दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

मूळ विचारापासून उद्धव ठाकरे लांब गेलेउद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे हिंदुत्व, तत्वे राखले त्यामागे जायला हवं होते. सावरकरांवर काँग्रेसनं विधान केले तर मूग गिळून गप्प बसावं लागते. कलम ३७० रद्द करणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते ते ज्यांनी साकार केले त्यांच्याविरोधात तुम्ही बोलता. कुठल्याही युतीचा आमच्यावर परिणाम होणार नाही. मूळ विचारापासून आपण लांब जातो तेव्हा त्या विचारापासून राहणारे लोक बाहेर पडतात. शिवसेनेच्या मूळ विचारासोबत राहिले त्यांना घाणेरडे बोलायचे ते जनतेला कळेल असंही केसरकरांनी सांगितले. धनुष्यबाण आणि शिवसेना आम्हालाच मिळेलज्यांचे अस्तित्व खोटे बोलणे, त्यावर राजकीय पोळी भाजून घेणे यावर आहे त्यांनी कुठेतरी थांबले पाहिजे. ठाकरेंनी वंचितसोबत युती करावी, महाविकास आघाडीसोबत जाणे हीच राजकीय आत्महत्या होती. विचारांनी ही आघाडी जुळत नाही. बाळासाहेबांच्या विचाराशी फारकत घेतलीय. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार त्याची जपणूक आम्ही करत आहोत. कुठल्याही राजकीय पक्षाला मान्यता दिली जाते ती लोकांनी दिलेल्या मतांवर होते. ९० टक्के खासदार, आमदार ज्यांच्या बाजूने आहेत तिथे निवडणूक आयोग न्याय देईल. मुख्य पक्ष आमच्यासोबत राहील. आम्हीच शिवसेना आहोत, धनुष्यबाण आमचा आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले नाही तर उठाव केला. चांगल्या गोष्टीसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी हा उठाव झाला. विरोधकांची सत्ता गेली ही वाईट गोष्ट असू शकते. पण महाराष्ट्राचा विकास या सरकारकडून होणार आहे असं दीपक केसरकरांनी सांगितले.  

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरे