शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:34 IST

याद राख, तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा इशारा भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. 

जालना- पोलीस जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले तेव्हा आधीच तयारी केली होती. पोलिसांनी तुमची तब्येत ढासळतेय असं विनंती करायला गेले तेव्हा दगडांचा मारा सुरू केला. ७० पोलीस पाय घसरून पडले का?  पोलिसांना कुणी मारले, महिला पोलिसांच्या घरी जा, तुम्हाला पत्ते देतो, त्यांच्यावर काय झाले हे वदवून घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सूनेलाही मानाने परत पाठवले, पण तुम्ही महिला पोलिसांवर काय केले, हे सगळे झाल्यावर लाठीचार्ज केला असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 

जालनातील अंबड इथं ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी हे विधान केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, पोलिसांची बाजू आलीच नाही, पोलिसांवर हल्ला झाला, महिला पोलीस जखमी झाल्या. एकच बाजू लोकांसमोर आणली जाते. लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन बसले, यांना अंबडचे आमचे मित्र राजेश टोपे, रोहित पवार यांनी त्यांना रात्री ३ वाजता घरातून घेऊन आले. शरद पवार येणार आहेत. पोलिसांवर लाठीचार्ज का झाला हे पवारांना सांगितले नाही. जर पवारांना हे माहिती असते तर आज वेगळे चित्र असते. मी फडणवीसांना विचारले, तुमच्याकडे सगळी माहिती आहे. तुम्ही सांगायला हवे होते, माझ्या पोलिसांवर हल्ला झाला मी सहन करू शकत नाही. राज्यापुढे आणि देशापुढे हे चित्र आले नाही. उलट पोलीस निलंबित, गृहमंत्री माफी मागायला लागले. गुन्हे मागे घेतो, हिंमत वाढली. किती लांगुनचालन करायचे? असा सवाल त्यांनी विचारला. 

त्याचसोबत बीडमध्ये प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला केला. पहिला दरवाजा तोडला, ऑफिस, गाड्या जाळल्या, सगळीकडे पेट्रॉल बॉम्ब, कोयते तयार होते, २००-४०० लोक गेली, दुसरा दरवाजा तोडला, तिथेही हल्ला झाला. एकच ग्रुप नव्हता तर अनेक ग्रुप होते, कोड नंबर देण्यात आले होते. सुभाष राऊतचे हॉटेल जाळण्यात आले, फरशाही उखडून टाकल्या, राखरांगोळी म्हणजे काय असते ते मी त्यादिवशी पाहिली. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर त्यांचेही ऑफिस, कार्यालय जाळून टाकले. आमचे मंत्री, माजी न्यायमूर्ती त्याला उठा, उठा म्हणायला गेले, याद राख, तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा इशारा भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. 

दरम्यान, क्षीरसागर यांच्या घरी पेट्रॉल बॉम्ब फेकले, घरात महिला, लहान मुले होती, गाड्या पेटल्या, आगीचे धूर झाले, खुर्च्यांवर उभ्या राहून लेकरांना पाय धरून महिलांनी भिंतीपलीकडे सुखरुप पाठवले, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला स्वकीयांची घरे जाळायला सांगितले? स्वतच्या आयाबहिणींना पेटवायला सांगितले. कोण करणार या घटनांची चौकशी, महाराष्ट्रात जातीय जनगणना झालीच पाहिजे, सगळेच मागणी करतायेत. मग अडचण कुठे, दूध का दूध, पानी का पानी हो जायेगा, जनगणना करा, आम्ही किती आहोत ते दाखवा. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मेळावे झाले पाहिजे. आता ही ज्योत तालुक्यातालुक्यात पेटली पाहिजे असं आवाहन भुजबळांनी ओबीसींना केले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील