शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:34 IST

याद राख, तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा इशारा भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. 

जालना- पोलीस जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले तेव्हा आधीच तयारी केली होती. पोलिसांनी तुमची तब्येत ढासळतेय असं विनंती करायला गेले तेव्हा दगडांचा मारा सुरू केला. ७० पोलीस पाय घसरून पडले का?  पोलिसांना कुणी मारले, महिला पोलिसांच्या घरी जा, तुम्हाला पत्ते देतो, त्यांच्यावर काय झाले हे वदवून घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सूनेलाही मानाने परत पाठवले, पण तुम्ही महिला पोलिसांवर काय केले, हे सगळे झाल्यावर लाठीचार्ज केला असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 

जालनातील अंबड इथं ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी हे विधान केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, पोलिसांची बाजू आलीच नाही, पोलिसांवर हल्ला झाला, महिला पोलीस जखमी झाल्या. एकच बाजू लोकांसमोर आणली जाते. लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन बसले, यांना अंबडचे आमचे मित्र राजेश टोपे, रोहित पवार यांनी त्यांना रात्री ३ वाजता घरातून घेऊन आले. शरद पवार येणार आहेत. पोलिसांवर लाठीचार्ज का झाला हे पवारांना सांगितले नाही. जर पवारांना हे माहिती असते तर आज वेगळे चित्र असते. मी फडणवीसांना विचारले, तुमच्याकडे सगळी माहिती आहे. तुम्ही सांगायला हवे होते, माझ्या पोलिसांवर हल्ला झाला मी सहन करू शकत नाही. राज्यापुढे आणि देशापुढे हे चित्र आले नाही. उलट पोलीस निलंबित, गृहमंत्री माफी मागायला लागले. गुन्हे मागे घेतो, हिंमत वाढली. किती लांगुनचालन करायचे? असा सवाल त्यांनी विचारला. 

त्याचसोबत बीडमध्ये प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला केला. पहिला दरवाजा तोडला, ऑफिस, गाड्या जाळल्या, सगळीकडे पेट्रॉल बॉम्ब, कोयते तयार होते, २००-४०० लोक गेली, दुसरा दरवाजा तोडला, तिथेही हल्ला झाला. एकच ग्रुप नव्हता तर अनेक ग्रुप होते, कोड नंबर देण्यात आले होते. सुभाष राऊतचे हॉटेल जाळण्यात आले, फरशाही उखडून टाकल्या, राखरांगोळी म्हणजे काय असते ते मी त्यादिवशी पाहिली. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर त्यांचेही ऑफिस, कार्यालय जाळून टाकले. आमचे मंत्री, माजी न्यायमूर्ती त्याला उठा, उठा म्हणायला गेले, याद राख, तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा इशारा भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. 

दरम्यान, क्षीरसागर यांच्या घरी पेट्रॉल बॉम्ब फेकले, घरात महिला, लहान मुले होती, गाड्या पेटल्या, आगीचे धूर झाले, खुर्च्यांवर उभ्या राहून लेकरांना पाय धरून महिलांनी भिंतीपलीकडे सुखरुप पाठवले, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला स्वकीयांची घरे जाळायला सांगितले? स्वतच्या आयाबहिणींना पेटवायला सांगितले. कोण करणार या घटनांची चौकशी, महाराष्ट्रात जातीय जनगणना झालीच पाहिजे, सगळेच मागणी करतायेत. मग अडचण कुठे, दूध का दूध, पानी का पानी हो जायेगा, जनगणना करा, आम्ही किती आहोत ते दाखवा. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मेळावे झाले पाहिजे. आता ही ज्योत तालुक्यातालुक्यात पेटली पाहिजे असं आवाहन भुजबळांनी ओबीसींना केले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील