शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये गेलेल्यांनी तिकडेच सुखी राहावे; थोरातांनी विखेंवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:28 IST

राज्यातील सरकार स्थापनेनंतर मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रथमच नगर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगर : निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले अनेक मित्र अस्वस्थ आहेत. ते तिकडे गेल्याने त्यांची जागा पक्षातील तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे मित्रांनी आता तिकडेच सुखी राहावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर नाव न घेता केली. राज्यातील सरकार स्थापनेनंतर मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रथमच नगर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते हेलिकॉप्टरने शुक्रवारी नगरमध्ये आले होते. येथील जिल्हा पोलीस मुख्यालयावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंत्री थोरात यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे आदी यावेळी उपस्थित होते.

मित्र परत येणार का, पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले. निवडणुकीपूर्वी अनेक मित्र, नेते पक्ष सोडून तिकडे गेले. पण, भाजपचे सरकार अल्पावधीत पडले. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. ते आपली फसवणूक झाली, असे सांगत आहे. मात्र ते तिकडे गेल्याने रिकामी झालेली जागा तरुणांनी धरली आहे. त्यामुळे तिकडे गेलेल्यांना परत घ्यायचे की नाही, हे आता तरुणांचा विचारावे लागेल. त्यामुळे काही दिवस त्यांनी तिकडेच राहावे, असे थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या तीन पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असून, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी थोरात यांचे पारंपरिक विरोधक माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपवासी झाले. विधानसभेची निवडणूक विखे यांनी भाजपकडून लढविली. प्रचारादरम्यान विधानसभेत १२-० करुन दाखवू, असा इशारा विखे यांनी दिला होता. तर कांग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी खिंड लढविली होती.

तर निवडणुकीदरम्यान विखे व थोरात यांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र निवडणुकीनंतर राज्यातील चित्र बदलले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. हे सरकार स्थापन होण्यात थोरात यांचा मोठा वाटा आहे. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर प्रथमच नगर शहरात आलेल्या थोरात यांनी विखे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.