शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये गेलेल्यांनी तिकडेच सुखी राहावे; थोरातांनी विखेंवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:28 IST

राज्यातील सरकार स्थापनेनंतर मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रथमच नगर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगर : निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले अनेक मित्र अस्वस्थ आहेत. ते तिकडे गेल्याने त्यांची जागा पक्षातील तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे मित्रांनी आता तिकडेच सुखी राहावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर नाव न घेता केली. राज्यातील सरकार स्थापनेनंतर मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रथमच नगर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते हेलिकॉप्टरने शुक्रवारी नगरमध्ये आले होते. येथील जिल्हा पोलीस मुख्यालयावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंत्री थोरात यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे आदी यावेळी उपस्थित होते.

मित्र परत येणार का, पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले. निवडणुकीपूर्वी अनेक मित्र, नेते पक्ष सोडून तिकडे गेले. पण, भाजपचे सरकार अल्पावधीत पडले. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. ते आपली फसवणूक झाली, असे सांगत आहे. मात्र ते तिकडे गेल्याने रिकामी झालेली जागा तरुणांनी धरली आहे. त्यामुळे तिकडे गेलेल्यांना परत घ्यायचे की नाही, हे आता तरुणांचा विचारावे लागेल. त्यामुळे काही दिवस त्यांनी तिकडेच राहावे, असे थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या तीन पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असून, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी थोरात यांचे पारंपरिक विरोधक माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपवासी झाले. विधानसभेची निवडणूक विखे यांनी भाजपकडून लढविली. प्रचारादरम्यान विधानसभेत १२-० करुन दाखवू, असा इशारा विखे यांनी दिला होता. तर कांग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी खिंड लढविली होती.

तर निवडणुकीदरम्यान विखे व थोरात यांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र निवडणुकीनंतर राज्यातील चित्र बदलले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. हे सरकार स्थापन होण्यात थोरात यांचा मोठा वाटा आहे. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर प्रथमच नगर शहरात आलेल्या थोरात यांनी विखे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.