शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये गेलेल्यांनी तिकडेच सुखी राहावे; थोरातांनी विखेंवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:28 IST

राज्यातील सरकार स्थापनेनंतर मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रथमच नगर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगर : निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले अनेक मित्र अस्वस्थ आहेत. ते तिकडे गेल्याने त्यांची जागा पक्षातील तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे मित्रांनी आता तिकडेच सुखी राहावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर नाव न घेता केली. राज्यातील सरकार स्थापनेनंतर मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रथमच नगर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते हेलिकॉप्टरने शुक्रवारी नगरमध्ये आले होते. येथील जिल्हा पोलीस मुख्यालयावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंत्री थोरात यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे आदी यावेळी उपस्थित होते.

मित्र परत येणार का, पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले. निवडणुकीपूर्वी अनेक मित्र, नेते पक्ष सोडून तिकडे गेले. पण, भाजपचे सरकार अल्पावधीत पडले. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. ते आपली फसवणूक झाली, असे सांगत आहे. मात्र ते तिकडे गेल्याने रिकामी झालेली जागा तरुणांनी धरली आहे. त्यामुळे तिकडे गेलेल्यांना परत घ्यायचे की नाही, हे आता तरुणांचा विचारावे लागेल. त्यामुळे काही दिवस त्यांनी तिकडेच राहावे, असे थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या तीन पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असून, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी थोरात यांचे पारंपरिक विरोधक माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपवासी झाले. विधानसभेची निवडणूक विखे यांनी भाजपकडून लढविली. प्रचारादरम्यान विधानसभेत १२-० करुन दाखवू, असा इशारा विखे यांनी दिला होता. तर कांग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी खिंड लढविली होती.

तर निवडणुकीदरम्यान विखे व थोरात यांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र निवडणुकीनंतर राज्यातील चित्र बदलले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. हे सरकार स्थापन होण्यात थोरात यांचा मोठा वाटा आहे. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर प्रथमच नगर शहरात आलेल्या थोरात यांनी विखे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.