शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

किमान वाचन, गणितासाठी कृती कार्यक्रम; राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा कार्यक्रम

By समीर देशपांडे | Updated: March 7, 2025 12:54 IST

सुट्टीतही करावे लागणार काम

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील दुसरी ते पाचवीच्या अनेक विद्यार्थ्यांना आदल्या इयत्तेतील धड्याचे किमान वाचन आणि किमान बेरीज-वजाबाकी येत नसल्याचे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे. त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ‘नास’ आणि ‘असर’ यांसारख्या राष्ट्रीय व राज्य स्तरांवरील विविध सर्वेक्षणांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची जी वस्तुस्थिती दर्शविण्यात आली आहे, त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भारत सरकारने निपुण भारतअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६/२०२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी हा कृती कार्यक्रम घेण्यात येईल.

शिक्षकांनी हे करायचे आहेशिक्षकांनी दिलेल्या नमुन्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी करावी. त्यानुसार अपेक्षित क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वत:चा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखायचा आहे. ३० जून पर्यंत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान ७५ टक्के विद्यार्थी अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील, याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करावयाची आहे.

सुट्टीतही करावे लागणार कामविद्यार्थ्यांनी ही कौशल्ये प्राप्त करावीत यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्तचा वेळ शिक्षकांनी वापरावा. याच कालावधीत मे महिन्याचीही सुट्टीही येत असल्याने सुट्टीतही अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबाबत संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी नियोजन करावे अशाही सुचना आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही बजावले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीGovernmentसरकार