शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

किमान वाचन, गणितासाठी कृती कार्यक्रम; राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा कार्यक्रम

By समीर देशपांडे | Updated: March 7, 2025 12:54 IST

सुट्टीतही करावे लागणार काम

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील दुसरी ते पाचवीच्या अनेक विद्यार्थ्यांना आदल्या इयत्तेतील धड्याचे किमान वाचन आणि किमान बेरीज-वजाबाकी येत नसल्याचे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे. त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ‘नास’ आणि ‘असर’ यांसारख्या राष्ट्रीय व राज्य स्तरांवरील विविध सर्वेक्षणांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची जी वस्तुस्थिती दर्शविण्यात आली आहे, त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भारत सरकारने निपुण भारतअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६/२०२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी हा कृती कार्यक्रम घेण्यात येईल.

शिक्षकांनी हे करायचे आहेशिक्षकांनी दिलेल्या नमुन्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी करावी. त्यानुसार अपेक्षित क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वत:चा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखायचा आहे. ३० जून पर्यंत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान ७५ टक्के विद्यार्थी अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील, याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करावयाची आहे.

सुट्टीतही करावे लागणार कामविद्यार्थ्यांनी ही कौशल्ये प्राप्त करावीत यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्तचा वेळ शिक्षकांनी वापरावा. याच कालावधीत मे महिन्याचीही सुट्टीही येत असल्याने सुट्टीतही अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबाबत संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी नियोजन करावे अशाही सुचना आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही बजावले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीGovernmentसरकार